गजबजलेल्या वस्तीतून हलवा श्रद्धास्थळे !
भाविकांच्या तसेच नागरिकांच्या जीवाला धोका असेल आणि दहशतवाद्यांना रोखण्याचे ठोस उपाय होत नसतील तर अशी मंदिरे सुरक्षितस्थळी हलवणेच योग्य ठरेल. मंदिरांना तसेच भाविकांच्या जीवाला धोका होणार असेल तर मंदिरे सुरक्षित स्थळी हलवावीत; अन्यथा गजबजलेल्या वस्त्या हटवून मंदिरे तरी सुरक्षित करावीत. या मुद्दय़ाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.
