ओवेसींच्या प्रभावाचा वाटा-घाटा कोणाला?
धर्माच्या नावाने राजकारण करणाºया पक्ष संघटना एकप्रकारे भारतीय संविधानालाच आव्हान देत आहेत़ ज्या संविधानाने सर्वधर्मसमभावाची भूमिका घेतली आहे़ त्या संविधानालाच शह देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे़ ओवेसी यांना आरक्षणाचा विषय मांडण्याचा हक्क आहे, त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, याची दक्षता घेण्याचे कर्तव्यदेखील आहे़
