राजकारण्यांच्या वरदहस्ताने वाळूमाफियांचा धुडगूस
महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये वाळूमाफियांनी धुडगूस घातला असून त्याला आळा
घालण्यासाठी सरकारने माफियांना एमपीडीए कायदा (महाराष्ट्र प्रोहिबिशन आॅफ डेंजरस
अॅक्टिव्हिटीज अर्थात महाराष्ट्र प्रतिबंध धोकादायक उपक्रम कायदा) लागू करण्याचा निर्णय घेतला
आहे़ महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधिमंडळात यासंबंधीची घोषणा केली आहे़
टीव्ही ९ या वृत्तवाहिनीच्या जालना येथील प्रतिनिधीवर वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केल्यामुळे
हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला़ याची तीव्र प्रतिक्रिया विधिमंडळ व संसदेत उमटली़



