Friday, March 30, 2012

दादांची फटकेबाजी


अर्थसंकल्पावर भाषण करताना टीकाटिपण्णी करणा-या विरोधकांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी चोख उत्तर दिले.

अर्थसंकल्पावर भाषण करताना टीकाटिपण्णी करणा-या विरोधकांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी चोख उत्तर दिलेदादा गुरुवारी एकदमच फॉर्मात होतेअर्थसंकल्पावरील चर्चेला दोन्ही सभागृहांत उत्तर देताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.विधानसभेतील उत्तराची सुरुवात करतानाच दादांनी विरोधी पक्षनेते खडसे यांची टोपी उडवलीते म्हणाले कीविरोधी पक्षनेते म्हणतात राज्यात चार कोटी ट्रॅक्टर आहेतअसे अर्थसंकल्पात म्हटले आहे.खडसेसाहेब स्वतनीट वाचत जादेवेंद्र तुमची फजिती व्हावी म्हणून चुकीचे ब्रिफिंग करतोट्रॅक्टरची संख्या चार कोटी नाहीतर चार लाख आहेअसे दादांनी म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

राज्यात वाढलेल्या कर्करोगाचे भयानक स्वरूप लक्षात घेऊन तंबाखूजन्य पदार्थ खाणा-या सदस्यांची त्यांनी चांगलीच फिरकी घेतली.विधान परिषदेत तर त्यांची प्रतिभा फारच फुलली होतीजैतापूर प्रकल्पाला विरोध करणा-या रामदास कदम यांची खिल्ली उडवताना दादा म्हणालेरामदास कदम हे गॅलरीमध्ये भेटले की म्हणतातआम्हालाही हा प्रकल्प हवा आहेत्यावर रामदास कदम अहोअसं मी बोललोच नाहीअसा खुलासा करू लागलेत्यावर दादा म्हणालेमला तुमची अडचण माहिती आहे होतुम्ही इथे कबूल केले तर,मातोश्रीवरून फोन येईलयाची मला कल्पना आहेअर्थ विभागाच्या संकेतस्थळावर अद्याप सुनील तटकरे यांचाच फोटो असल्याचा मुद्दा बुधवारी विनोद तावडे यांनी मांडला होतात्यावर मिष्किल प्रतिक्रिया व्यक्त करताना दादांनी शेकापचे जयंत पाटील यांची फिरकी घेतली.ते म्हणाले मी माझा फोटो तेथे टाकणार होतोमात्र जयंत पाटीलच म्हणालेअजित तू माझं सगळं ऐकतो मगत्या वेबसाइटवर सुनीलचा फोटो राहू देत्यामुळे मीच आमच्या अधिका-यांना सांगितलं कीतटकरे यांचं खातं गेलं आहेनिदान फोटो तरी संकेतस्थळावर राहू द्यात्याचवेळी समोरच्या बाकांवरून विचारणा झाली कीकोणत्या जयंत पाटलांनी सांगितलेत्यावर अजितदादा म्हणालेहे आमचे शेकापचे जयंत पाटीलआमच्या जयंत पाटलांचा फोटो आबांना आवडतोजयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील संघर्षाची त्याला पार्श्वभूमी असल्याने सभागृहात पुन्हा हास्यकल्लोळ झाला.

नेहमी थेट बोलणा-या दादांची काव्यप्रतिभाही फुलली होतीत्यांनी सांगितले की विरोधक म्हणतातसांगा कसंजगायचंकण्हत कण्हत जगायचं की गाण गातं जगायचंमी म्हणतोते ज्याचं त्याने ठरवायलं पाहिजेमी तुम्हाला सांगतोतुम्हीच ठरवाशाप देत बसायचं की दुवा देत हसायचं..

दादांच्या या काव्यपंक्तीवर सत्ताधा-यांसह विरोधी बाकांवरील सदस्यांनीही बाके वाजवून प्रतिसाद दिला.

Read more...

Thursday, March 29, 2012

झोपी गेलेले जागे झाले

जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आणि करवाढीवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याऐवजी सत्ताधारी पक्षांनीच करवाढ रद्द करण्याची मागणी लावून धरली आणि विरोधकांना नंतर जाग आली, असा प्रकार घडला. 

जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आणि करवाढीवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याऐवजी सत्ताधारी पक्षांनीच करवाढ रद्द करण्याची मागणी लावून धरली आणि विरोधकांना नंतर जाग आली, असा प्रकार घडला. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढवण्यास सर्वप्रथम काँग्रेस पक्षानेच आक्षेप घेतला. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे शिष्टमंडळही नेले. मुख्यमंत्र्यांनीही फेरविचाराचे आश्वासन दिले. त्यानंतर इतर पक्षांना जाग आली

काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप, मनसे गॅस दरवाढीबद्दल ओरड करत असताना शिवसेनेला मात्र गाढ झोप लागली होती. इतर पक्ष काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष देण्याऐवजी त्यांचा नेहमीप्रमाणे भावनेच्या राजकारणावरच अधिक भर होता. गॅस सिलिंडरपेक्षा त्यांना गणपतीची चोरी जास्त महत्त्वाची होती. लोक म्हणतात आधी पोटोबा मग विठोबा पण शिवसेनेचे उलटे आहे. आधी गणपती मग गॅस सिलिंडर याचा प्रत्यय आला खरा.

मंगळवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिवेआगरच्या गणपतीची चोरी आणि मुंबई महापालिकेचे प्रश्न यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते. चर्चेनंतर सर्वाना बाहेर काढून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड गुफ्तगू केले. पण गॅस सिलिंडरचा मात्र त्यांना विसर पडला. सत्ताधाऱ्यांकडून कर कमी करण्याची मागणी पुढे आल्यानंतर झोपी गेलेले शिवसेनेचे सदस्य तिस-या दिवशी जागे झाले आणि सभागृहात निषेधाचे फलक घेऊन हजर झाले. गॅसवरील कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सभागृहात करण्यास त्यांनी सुरुवात केली. शिवसेनेच्या काही सदस्यांनी अंगावर फलक फडकावत वाढीव कराचा निषेध नोंदवला. पण आधी सत्ताधाऱ्यांनीच गॅसवरील कराची मागणी रेटून धरल्याने शिवसेनेच्या निषेधाचा बार फुसकाच ठरला. सर्वसामान्यांसाठी आपण काहीतरी करून दाखवतोय, एवढाच दिखावा शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात केला. काही मिनिटे निषेध करत हे सदस्य बाहेर पडले. मात्र या आंदोलनात फारसा जोर नव्हता.

मुळात अर्थसंकल्पात घरगुती गॅसच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर सर्वसामान्यांना त्याची झळ पोहोचणार हे निश्चित होते. पण शिवसेनेला त्याची तीव्रता जाणवलीच नाही. गॅसच्या विषयावर सत्ताधारी काँग्रेस आक्रमक झाल्याने शिवसेनेला सर्वसामान्यांचा कळवळा आला आणि सर्वसामान्यांसाठी आपण काहीतरी करतोय हे दाखवण्याची केविलवाणी धडपड सुरू झाली. बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर शिवसेनेचे काही सदस्य सभागृहात निषेधाचे फलक अंगावर झळकवत हजर झाले. मात्र, त्यांच्या आंदोलनाचा जोर कमीच होता. त्यांच्या या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही आणि इतर विरोधी सदस्यांकडून समर्थनही मिळाले नाही. त्यामुळे शिवसेना सदस्यांचा उत्साहच मावळला. आपले आंदोलन फुसका बार ठरला असल्याचे ध्यानी येताच या सदस्यांनी सभागृहाच्या बाहेर जाण्याचा रस्ता धरला.

Read more...

Wednesday, March 28, 2012

आमदारांचा दुष्काळ


राज्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. अद्याप मार्च महिना संपलेला नसता अनेक तालुक्यांवर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. चाऱ्यावाचून जनावरे तडफडत आहेत. महिलांना पाच-पाच किमीवरून पाण्याचे हंडे डोक्यावर वाहावे लागत आहेत. जलाशयातील पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावत आहे. शेतातील पिके पाण्यावाचून करपली आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. ऑगस्ट महिन्यात जो शेवटचा पाऊस झाला त्यानंतर परतीचा पाऊसच न झाल्याने राज्यावर भीषण संकट कोसळले आहे. या दुष्काळावर सविस्तर चर्चा व्हावी आणि राज्यातील जनतेला दिलासा मिळावा, यासाठी काँग्रेसचे सदस्य सदाशिव पाटील यांनी नियम २९३ अन्वये चर्चा उपस्थित केली होती. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे या चर्चेच्या वेळी सभागृहात आमदारांच्या उपस्थितीचा दुष्काळ असल्याचे दिसून आले. 

लक्षवेधी सूचनेनंतर सभागृहात दुष्काळाचा प्रस्ताव चर्चेला आला तेव्हा त्याचे उत्तर देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्रीच उपस्थित नव्हते. दुष्काळाचा विषय हा कृषी, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन, महसूल अशा अनेक खात्यांशी संबंधित असतो. त्यामुळे या महत्त्वाच्या चर्चेच्या वेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित असणे आवश्यक होते. मात्र या खात्याचा एकही मंत्री या चर्चेच्या प्रारंभी उपस्थित नसल्याचे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे या प्रस्तावावर बोलायला उभे राहिले तेव्हाही सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री नसल्याबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. राज्यातील जनतेच्या जीवन-मरणाशी संबंधित असणाऱ्या दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. जोपर्यंत संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात येत नाहीत तोपर्यंत सभागृह तहकूब करावे, अशी मागणी त्यांनी केली. तालिका अध्यक्ष गिरीष बापट यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृह सुरू झाले तेव्हा मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी मैं हूँ नाच्या आविर्भावात सभागृहात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आले.

संबंधित खात्याचे मंत्री जरी सभागृहात आले असले तरी आमदारांची उपस्थितीती मात्र अत्यंत तुरळक होती. जे आमदार उपस्थित होते त्यांचीही चुळबूळ सुरू होती. शेतकऱ्यांचे कैवारी, तारणहार आणि आम्ही शेतकरी आहोत, असा दावा करणारे आमदारच सभागृहात दिसत नव्हते. जे होते तेही आपले भाषण झाले की सभागृहातून काढता पाय घेत होते. एकंदर दुष्काळावरील चर्चेच्या वेळी मंत्री आणि आमदारांचा सभागृहात दुष्काळ असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP