दोन दादा रोखठोक, काम चोख
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात वाद वाढत चालले आहेत. मंत्रिमंडळाची एकही बैठक वादविवाद, मतभेद आणि भांडणाशिवाय पार पडत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यापासून वादविवादाला तोंड फुटते आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लगेच वनमंत्री काँग्रेसचे डॉ. पतंगराव कदम पुढे सरसावतात. त्यापाठोपाठ इतरांना खुमखुमी आल्याशिवाय राहत नाही.