Monday, June 27, 2011

बूंदसे गई वो हौदसे नही आती...


ओबीसींना आरक्षण देणा-या मंडल आयोगाला विरोध करायचा आणि निवडणुकीत मतांसाठी ओबीसींना जवळ करायचे, समाजातील जाती-जातींमध्ये विद्वेष वाढविण्याचे काम करायचे, अशा प्रकारे समाजात फूट पाडण्याचे काम संघ परिवाराने सुरू ठेवले आहे आणि हिंदुत्ववादी ओबीसी नेत्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले, त्याविरुद्ध ठाम भूमिका घेऊन उभे राहिले नाहीत. व्यक्तिगत पातळीवर काही कमी पडले की बंडाची भाषा सुचते. मुंडेंच्या बंडाने नेते आणि पक्ष दोघांची घसरण सुरू झाली असल्याचे दिसत आहे.

भारतीय जनता पार्टीचे नाव बदलून भारतीय झगडा पार्टी ठेवले पाहिजे. गटबाजीने पूर्णत: पोखरलेल्या या पक्षाने अण्णा हजारे आणि रामदेवबाबा यांना काँग्रेसवर सोडून काँग्रेसची डोकेदुखी वाढवली होतीपण भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याच पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड पुकारून काँग्रेसच्या डोकेदुखीवर उपचार करण्याची तत्परता दाखवली. मुंडेंचे बंड हे काँग्रेसच्या डोकेदुखीवर झंडूबाम ठरले आहे. पक्षांतर्गत गटबाजीने आणि भांडण-झगडय़ाने पोखरलेला भाजप हा विरोधी पक्ष सत्ताधा-यांवर अंकुश कसा काय ठेवणारलोकसभेत विरोधी पक्ष उपनेते असलेल्या मुंडेंनी आपल्या पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंड केल्यामुळे हा पक्ष जखमी होऊन निपचित पडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर कशीबशी मलमपट्टी करण्याचे आणि मुंडेंना समर्थन देऊन आपला गट समर्थ करण्याचे काम विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केले. पण दुखावलेले मुंडे सावरण्याची चिन्हे दिसत नाहीत. पक्षनेतृत्वाला पूर्णपणे उघडे पाडण्याचा निर्धार करून ते महाराष्ट्र दौ-यावर जाणार आहेत.           
 
भाजपमध्ये गेले कित्येक महिने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धुसफूस सुरू झाली आहे. तिला चव्हाटय़ावर मांडण्याचे काम मुंडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले आहे. केंद्रातील काँग्रेस सरकारवर अण्णा-बाबांना सोडून मजा पाहणा-या भाजपचा पुरता फज्जा उडाला आहे. गोपीनाथ मुंडेंनी बंड नेमके कशासाठी केलेत्यांना काय करायचे होतेत्यांना काय हवे होतेया प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळाली नाहीत. राज्यात आपल्या समर्थकाचे विरोधी पक्षनेतेपद जाणार आणि पुण्यात आपल्या समर्थकाला अध्यक्ष केले नाही यावरून राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याने  आकांडतांडव करून पक्ष सोडण्याच्या धमक्या द्याव्यात एवढे नेतृत्व खुजे झाले आहेअशी चर्चा होऊ लागली आहे. काँग्रेसमध्ये आधार नाही आणि भाजपमध्ये निराधार अशी बंडानंतर झालेली अवस्था पाहता बंड फसले असेच म्हणावे लागेल. याचे कारण या बंडामागे कोणतीही योग्य रणनीती नसल्याचे दिसले. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपमध्ये यापूर्वी बंड झाले नाहीअसे नव्हे. शिवसेनेतले बंड तर फारच गाजले आहे. छगन भुजबळ,नारायण राणेगणेश नाईक आणि राज ठाकरे यांनी बंड केले. पण त्यामागे एक निश्चित विचार होता. भुजबळांना तेव्हा आक्रमक शिवसेनेचा पक्षांतर करताना त्रास झाला. पण नारायण राणेंनी पक्षसंघटनेच्या मजबुतीसाठी मांडलेली परखड मते कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना पटली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला. तो समजताच राणे काँग्रेस पक्षात गेले आणि त्यांनी महसूलमंत्रीपदाची शपथही घेतली. काळाची  पावले ओळखून त्यांनी बेमालूमपणे यशस्वी राजकारण केलेराज ठाकरे यांनी तर स्वतंत्र पक्ष काढला आणि पाहिल्याच निवडणुकीत 13 आमदार निवडून आणले. पण एरव्ही स्वत:ला शरद पवारांच्या पंक्तीत नेऊन बसवणारे मुंडे आपल्या बंडाचे डावपेच आखण्यात सपशेल फसले. त्यांच्या बंडाचा त्यांना किंचितही फायदा मिळाल्याचे दिसत नाही. मुंडे काँग्रेसमध्ये जाणारत्यांना केंद्रात मंत्रीपद मिळणारते विलासरावांना भेटलेमोहन प्रकाशना भेटले एवढेच काय अहमद पटेलांना भेटलेसोनिया गांधींना भेटणारअशी वृत्ते दिवस-रात्र वाहिन्यांवर दाखवली जात होती. पण मुंडेंना ग्रीन सिग्नल मिळू शकला नाहीगाडी रेड सिग्नलजवळच थांबली आणि परत यार्डात गेली. किमान पाच दिवसात ग्रीन सिग्नल मिळेल अशा तयारीने डावपेच आखले असते तर बंड फसले नसते. मुंडे काँग्रेसमध्ये जाऊ शकले असते. पण त्यासाठी तटबंदी मजबूत करावी लागतेपण मुंडेंना काँग्रेसने का घ्यावेहाही प्रश्न आहे. काँग्रेसला त्यांची गरज नाही आणि मुख्यमंत्रीपदासाठी तर काँग्रेसमध्ये लाइन लागलेली आहे. तसे पाहता मुंडे हे विलासराव,नारायणरावअशोकराव या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत. मराठवाडय़ात निवडणुकीच्या राजकारणात विलासराव-गोपीनाथराव हे सख्खे शेजारी असतातएकमेकांचे निकटवर्ती निवडून आणण्याकरिताएकमेकांना मदत करीत असतात,एकमेकांचे विरोधक पाडण्यासाठीदेखील मदत होत असते. त्यामुळेच बहुधा विनोद तावडेंनी लातूर पॅटर्न म्हटले असावे. ही राजकीय मैत्री आता सर्वपरिचित झाली आहे. नारायण राणेंना तर मुंडेंच्या मदतीची गरज नसतेकोकणातील आपल्या निवडणुका लढविण्यासाठी ते स्वत:च समर्थ आहेत. अशोक चव्हाणांना सोयीनुसार त्यांची मदत होते. त्यामुळे तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांना मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाचा प्रश्न नव्हता. पण आपल्याच विवंचनेत असलेल्या भाजपची आणखी नाचक्की नको,असा सूज्ञपणा काँग्रेसने दाखविलेला दिसतो. त्यामुळे मुंडे माघारी फिरलेसोनिया गांधींपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सुषमा स्वराज यांच्यासोबत बचावात्मक पवित्रा घेत आपण भाजपमध्येच राहणारअसे त्यांना जाहीर करावे लागले. मुंडेंची घुसमट काही थांबली नाही. त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मान्य करण्याचे आश्वासन त्यांना मिळालेअसेही झालेले नाही. कारण भाजपमध्ये राहणारअसे जाहीर करून चार तास उलटत नाहीत तोच मुंडेंनी पक्षांतर्गत विरोधकांवर तोफ डागलीत्यांचा नेम गडकरींवर असल्याने चिडलेल्या गडकरींनी आधी ठरलेली मुंडेंची भेट टाळली. त्यामुळे मुंडेचा पक्षांतर्गत संघर्ष अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडेंनी केलेल्या बंडाचा सर्वाधिक परिणाम कार्यकर्त्यांवर झाला आहे. कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. नेत्यालाच पक्षात किंमत नसेलबंड करावे लागत असेल. तर आपले काय होणारहा प्रश्न त्यांना पडला आहे. तसे कार्यकर्त्यांना तिकिटेही मिळत नाही आणि केवळ आशेवर काम करावे लागते. नेत्याची पत राहिली नसेल,घसरण होऊ लागली असेल तर कार्यकर्त्यांनी तरी सोबत का राहावेअशी कुजबूज सुरू झाली आहे.
 
शेटजी-भटजीचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ओबीसी नेत्यांचा वापर करून घेतला आणि त्याच वेळी ओबीसी नेत्यांची वाढलेली ताकद कमी करण्यासाठी त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्नही केला. नितीन गडकरींसारख्या संघाच्या निष्ठावान उच्चवर्णीय नेत्याची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करून संघाबरोबरच भाजपचा जातीय चेहरा त्यांनी पुन्हा एकदा लोकांसमोर आणला. सामाजिक समरसत्तेच्या नावाखाली सोयीनुसार रंग पालटणा-या संघाची अनेक रूपे वेळोवेळी प्रगट झाली आहेत. ओबीसींना आरक्षण देणा-या मंडल आयोगाला विरोध करायचा आणि निवडणुकीत मतांसाठी ओबीसींना जवळ करायचेसमाजातील जाती-जातींमध्ये विद्वेष वाढविण्याचे काम करायचेअशा प्रकारे समाजात फूट पाडण्याचे काम संघ परिवाराने सुरू ठेवले आहे आणि हिंदुत्ववादी ओबीसी नेत्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेत्या विरुद्ध ठाम भूमिका घेऊन उभे राहिले नाहीत. व्यक्तिगत पातळीवर काही कमी पडले की बंडाची भाषा सुचते. मुंडेंच्या बंडाने त्यांची तसेच नेते आणि पक्ष दोघांची घसरण सुरू झाली असल्याचे दिसत आहे.

धर्म-जातीच्या नावाने राजकारण करणारे आजही जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. मागासवर्गीय नेत्यांचा वापर केवळ मतांसाठी होत आहे. रिपब्लिकन नेते रामदास आठवलेदेखील स्वत:चा बळी द्यायला निघाले आहेत. मुंडे भाजप सोडणार, या वृत्ताने भाजपत नव्हेत तर शिवसेनेत अस्वस्थता वाढली होती. कारण शिवशक्ती-भीमशक्तीत ओबीसी चेहरा हवा होता. दुबळय़ा उद्धव ठाकरेंना धनुष्य पेलवणार नाही त्यासाठी मुंडेंची प्रत्यंचा हवी आहे. म्हणूनच मुंडेंना गडकरी भेटत नाहीत पण उद्धव ठाकरे दोन वेळा भेटले. दुखावलेले मुंडे आता महाराष्ट्र दौरा काढणार आहेत. तो कार्यकर्त्यांसाठी असल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पक्षनेतृत्वाविरुद्ध वातावरण तयार करण्याचा प्रयत्न असेल. मुंडेंच्या फसलेल्या बंडाने  ‘बूंदसे गई वो हौदसे नही आती’ असा प्रकार घडला आहे

Read more...

Monday, June 20, 2011

मनमानी राजकारण्यांना सावधानतेचा इशारा


एकाधिकारशाहीविरुद्ध क्रांती सुरू झाली. भारतातही भ्रष्टाचाराविरुद्ध जनमत संघटित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ‘आम्ही कर भरतो’, ‘आम्ही राष्ट्रीय उत्पन्न वाढवितो’ त्यामुळे जीवन सुरक्षित आणि सुरळीतपणे जगण्याचा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकभावना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तर राजसत्ता उलथवून टाकण्याचे नैतिक बळ लोकांमध्ये आहे, असा इशारा देण्यास लोकांनी सुरुवात केली आहे. क्रांतीची बीजे आता सर्वत्र रोवली गेली. एकाच धर्माचा पगडा असलेल्या मध्य-पूर्वेतील मुस्लिम देशांमध्ये क्रांती होऊन जगाला आश्चर्याचा धक्का दिला. इजिप्तमध्ये नुकतीच झालेली क्रांती ही तरुणांनी घडवून आणली यावरून तरुणाई किती जागृत झाली आहे हेच दिसून येते.

सर्वसामान्य माणसांच्या राजकीय सामाजिक, आर्थिक हक्कांवर गदा आणून हुकूमशाही किंवा एकाधिकारशाहीने लोकांना दडपून टाकण्याचा मनमानीपणा राज्यकर्त्यांनी केला तर लोक रस्त्यावर येऊन उठाव केल्याशिवाय राहत नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. राज्यकर्त्यांनी केलेल्या दडपशाहीविरुद्ध उठाव करण्याची लाट जगभरात आली आहे. टय़ुनिशियाच्या जस्मीन क्रांतीनंतर इजिप्त, सिरीया, येमेन, बहारीन, लिबीया या देशांमध्ये एकाधिकार राजसत्तेविरुद्ध क्रांती सुरू झाली. भारतातही भ्रष्टाचाराविरुद्ध जनमत संघटित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ‘आम्ही कर भरतो’, ‘आम्ही राष्ट्रीय उत्पन्न वाढवितो’त्यामुळे जीवन सुरक्षित आणि सुरळीतपणे जगण्याचा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. लोकभावना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तर राजसत्ता उलथवून टाकण्याचे नैतिक बळ लोकांमध्ये आहे, असा इशारा देण्यास लोकांनी सुरुवात केली आहे. क्रांतीची बीजे आता सर्वत्र रोवली गेली आहेत. एकाच धर्माचा पगडा असलेल्या मध्य-पूर्वेतील मुस्लिम देशांमध्ये क्रांती होऊन जगाला आश्चर्याचा धक्का देण्यात आला. इजिप्तमध्ये नुकतीच झालेली क्रांती ही तरुणांनी घडवून आणली यावरून तरुणाई किती जागृत झाली आहे हेच दिसून येते. त्याच धर्तीवर अण्णा हजारेंच्या आंदोलनातही जास्तीत जास्त तरुणांना सहभागी करण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला होता.?

गेल्या सप्ताहात इजिप्तला भेट दिली. या दौऱ्यात नुकत्याच झालेल्या क्रांतीच्या खुणा अजूनही पदोपदी जाणवत आहेत. गेली तीन दशके  लोकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणून मनमानी करणा-या राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांच्या हुकूमशाही राजवटीला खाली खेचण्याची तेजस्वी क्रांती तरुणांनी घडविली. 25 जानेवारी 2011 रोजी मुस्लिमांना पवित्र असणा-या शुक्रवारच्या दिवशी कैरोच्या तहारीर चौकात हजारोंच्या संख्येने  जमा झालेल्या जनसमुदायाने आपला संताप व्यक्त केला. कैरोतील सुप्रसिद्ध म्युझियमशेजारी असलेल्या इमारतीमध्ये मुबारक यांच्या मुलाचे गमाल मुबारक यांचे कार्यालय युवकांनी जाळून टाकले. त्या बहुमजली इमारतीला आग लावली. 15 मजल्यांची ही इमारत जळून खाक झाली आहे.  याबाबत एका सुरक्षारक्षकाला विचारले असता, गमालचे कार्यालय आंदोलकांनी जाळून टाकले तो आता तुरुंगात आहे, असे धीटपणे सांगून टाकले.?मुबारक यांची दोन्ही मुले तुरुंगात आहेत आणि मुबारक शर्म-अल-शेख येथील एका रुग्णालयात दाखल आहेत.

तब्बल 18 दिवस तरुण आंदोलकांनी तहारीर चौक दणाणून सोडला आणि होस्नी मुबारक यांचे सिंहासन हादरवून टाकले. मुबारक यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा इजिप्तसह जगभरात आनंद व्यक्त करण्यात आला. होस्नी मुबारकविरुद्ध केवळ? 18 दिवसात उठाव झालेला नाही.?त्यांच्या कारभाराविरुद्ध लोकांमध्ये अनेक वर्षापासून असंतोष धुमसत होता. त्यांनी देशाच्या संविधानात जी काही कलमे घातली होती त्यामुळे लोकांच्या सहनशीलतेची मर्यादा संपली होती. अध्यक्ष सक्षम नसेल तर सत्तेची सूत्रे उपाध्यक्ष किंवा पंतप्रधानांकडे असतील पण त्यांना कोणतेही संविधानी अधिकार नसतील. त्यांना मंत्रिमंडळ बरखास्त करता येणार नाही, घटना दुरुस्ती करता येणार नाही. अध्यक्षपद रिकामे असेल किंवा अध्यक्षाला अपंगत्व आले असेल तर मुख्य न्यायमूर्ती कार्यभार सांभाळतील पण त्यांना अध्यक्ष म्हणून पद स्वीकारता येणार नाही.? 60 दिवसात नव्या अध्यक्षाची निवड करावी लागेल. एक वर्ष सलग अध्यक्ष राहिलेलीच व्यक्ती अध्यक्षीय निवडणुकीत उतरू शकेल, अशी स्वत:ची खुर्ची शाबूत ठेवणारी कलमे मुबारक यांनी संविधानात घातली होती. ?

होस्नी यांच्या राजीनाम्यानंतर इजिप्तमध्ये सर्वसामान्य लोकांवर असणारे दडपण पार निघून गेले आहे. लोक उघडपणे या हुकूमशहाविरुद्ध बोलू लागले आहेत. पूर्वी लोक प्रतिक्रियाही देत नव्हते.?पण आता मुबारक यांना उघडपणे दूषणे देत आहेत. महंमद नावाच्या एका दुकानदाराला मुबारक यांच्याबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘मुबारक चोर आहे. तो परत येणार नाही.’ एका ड्रायव्हर अहमदला विचारले तर तो म्हणाला, ‘मुबारक आता परत येणे शक्य नाही. आम्हाला लोकांनी आणलेले सरकार हवे आहे. राजा असेल तर तो रामसेसारखा तरी असावा.?ज्याने पुरातन काळात इजिप्तचा विकास आणि लोकांचे कल्याण यावर भर दिला होता.’ आता इजिप्तमध्ये मुबारक गेल्याचा आनंद इतका उघडपणे साजरा केला जात आहे की, 25 जानेवारी, होस्नी मुबारक आऊट, वुई डिड इट (आम्ही हे केले) असे डिझाइन असलेले टी शर्ट, पर्सेस, शोभेच्या वस्तू बाजारात आल्या आहेत. प्रत्येक वस्तूवर ‘होस्नी आऊट’ असे लिहिले जात आहे.

खरे तर इजिप्तची क्रांती ही संपर्काच्या क्षेत्रात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे झालेली आहे. फेसबुकने ही क्रांती घडविली.टय़ुनिशियामधील पत्रकार महंमद क्रिशेने याने स्थानिक पत्रकाराला हाताशी धरून असंतोषाच्या घटनांचे व्हिडीओ फेसबुकवर पाठविले त्यामुळे आंदोलनाला सार्वत्रिक पाठिंबा मिळाला. त्यामुळे मुबारक यांनी फेसबुक, इंटरनेट, एसएमएस या सर्वावर बंदी घातली. तरीही या तंत्रज्ञानामुळे जगात माहिती पोहोचली. इजिप्तमध्ये सुरू झालेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला.संतापलेल्या मुबारक यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांची लैंगिक चाचणी करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे अरब जगतातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. महिलांच्या सहभागामुळे आंदोलनाला धार चढली. जेव्हा-जेव्हा महिला मोठय़ा संख्येने आंदोलनात उतरल्या त्या-त्या वेळी आंदोलनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. आपल्या देशात स्वातंत्र्य आंदोलनापासून संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच महागाई प्रतिबंधक आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम, सीमा लढा या सर्व आंदोलनांमध्ये मोठय़ा संख्येने महिला उतरल्या होत्या. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामध्ये मोठय़ा संख्येने महिला घराबाहेर पडल्या असे दिसले नाही. अरब जगतामध्ये बुरखा पद्धती असूनही महिला रस्त्यावर उतरत आहेत. यावरून एकाधिकारशाहीविरुद्ध संताप किती तीव्र आहे याची कल्पना येते.
 इजिप्तमधील आंदोलनाला कुणी नायक नसला तरी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेचे माजी अध्यक्ष व शांतता नोबेल विजेते मोहंमद अल बरादाय याचे संपूर्ण पाठबळ मिळाले. आजही दर शुक्रवारी तहारीर चौकात लोक जमतात, पोस्टर्स, बॅनर्स लागलेले असतात.घोषणाबाजी सुरू असते. त्यांच्यावर निर्बंध आणण्याकरिता लष्कर तैनात केले जात आहे.चौकाकडे जाणारे सर्व रस्ते सार्वजनिक वाहतुकीकरिता बंद केले जात आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये निवडणुका घेण्याचे ठरले आहे. परंतु या निवडणुकीबद्दल अनिश्चितता आहे. पण काही तरी चांगले निश्चित घडेल असा विश्वास लोकांना वाटतो आहे. सध्या मात्र या अनिश्चिततेमुळे इजिप्तच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. खरे तर पर्यटन हे इजिप्तच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. जगभरातील लोक येथील रामसे राजे, नेफरतरी राणी, स्फिंस्क, जगप्रसिद्ध पिरॅमिड, लग्झरचे कर्णाक मंदिर,अबू सिंबल, राजे राण्यांच्या ममीज असलेले संग्रहालय तसेच नाईल नदीवरील नौकानयन पाहण्यासाठी येत असतात. साडेचार हजार वर्षापूर्वीचा इतिहास पाहण्यासाठी लोकांची फार उत्सुकता आहे.पण त्या पर्यटनावरच आता परिणाम झाला आहे.?पण आपल्या देशामध्ये लोकशाही स्थापन करण्यासाठी किंमत मोजावी लागेल याचीही जाणीव येथील लोकांना आहे. अरब राष्ट्रांमध्ये एकाधिकारशाही विरुद्ध उमटत असलेली प्रतिक्रिया पाहता राजकारण्यांनी सावध होण्याची गरज आहे. लोक जागृत झाले आहेत. मनमानी करणा-यांना धडा शिकविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Read more...

Monday, June 6, 2011

राजकारणासाठी वापरले जाते बाबासाहेबांचे नाव


प्रसिद्ध ठिकाणांना महापुरुषांची नावे देण्याची प्रथा सर्व जगात आहे. रस्ते, पूल, विमानतळ, रेल्वेस्थानके, संग्रहालये, विद्यापीठे अशा सर्वसामान्यांशी संबंधित असलेल्या स्थळांना महापुरुषांची नावे दिली जातात. हे नामांतर बिनबोभाट होत असते. पण बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा प्रश्न पुढे येताच समाजात वेगवेगळे प्रवाह निर्माण होतात. समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये संघर्ष सुरू होतो. या संघर्षाला जातीय संदर्भ असल्याने तो संघर्ष चिघळत ठेवून त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न अनेक वर्षे लोंबकळत ठेवून समर्थक विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली. आता तोच प्रकार दादरच्या नामांतराबाबत होईल की काय, अशी भीती वाटू लागली.

आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे चलनी नाणे वारंवार वापरले जाते. निवडणुका आल्या की सर्वाना बाबासाहेबांची आणि त्यांच्या विचारांची आठवण होते. महानगरपालिकाजिल्हा परिषदांच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेततसे बाबासाहेबांच्या नावाचे राजकीय भांडवल करण्यासाठी सर्वच पक्ष पुढे सरसावले आहेत. अगदी परवा-परवापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांना आणि नावाला विरोध करणा-या शिवसेनेनेही आता बाबासाहेबांबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास विरोध करीत दलितांची घरे जाळणा-या शिवसेनेनेही आता दलित मतांसाठी आपली भूमिका बदलली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यास आपला कधीच विरोध नव्हता’, असा खुलासा केला. हा खुलासा करण्यासाठी शिवसेनेला 16 वर्षे लागलीयावरून त्यांचा विरोध किती तीव्र होता याची कल्पना येते. शिवसेनेचे पूर्णत: खच्चीकरण झाले आहे. त्यांच्या जागाही कमी होऊ लागल्या आहेत. त्यांची बहुसंख्य मते नारायण राणे व राज ठाकरे यांच्यामागे गेली आहेत त्यामुळे रामदास आठवलेंना बरोबर घेऊन दलितांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मात्र मतांसाठी किती जरी गळय़ात गळे घातले तरी यांनीच पूर्वी आपले गळे कापले आहेतहे रामदास आठवले विसरले असले तरी दलित जनता कधीही विसरणार नाही. आठवले आणि त्यांच्या गटाला घेऊन शिवसेना दलितांची आळवणी करीत आहे. 9 जून रोजी होणा-या शिवशक्ती-भीमशक्ती मेळाव्याचा प्रयोगही त्यासाठीच सुरू आहे.
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेततसा सर्वच पक्षांना आता दलित जनता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कळवळा निर्माण झाला आहे. काँग्रेसने हे वर्ष समरसता वर्षे म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहेतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला 11 वा वर्धापनदिन सामाजिक हक्क दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एवढे करूनच थांबली नाहीतर त्यांनी अत्यंत चलाखीने दादर रेल्वेस्थानकाच्या नामांतराचा प्रश्न उकरून काढून दलितांची मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा 11 वा वर्धापनदिन 10 जून रोजी आहे. 10 जूनच्या कार्यक्रमात दादर रेल्वेस्थानकाला चैत्यभूमी’ नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असल्याची बातमी जाणीवपूर्वक पसरविण्यात आली.
 
ज्या ज्या वेळी दलितांना आकर्षित करून त्यांची मते वळविण्याची गरज भासते तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर केला जातो. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न चिघळत ठेवून असेच राजकारण करण्यात आले. राजकीय पुढा-यांचे राजकारण झालेमात्र त्यात गोरगरीब दलितांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेक दलित तरुणांचे बळी गेले. आता पुन्हा दादरच्या नामांतराचा प्रश्न उकरून काढला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रश्न उकरून काढताच अपेक्षेप्रमाणे चर्चेला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दादरच्या नामांतराची मागणी आपलीच असल्याचे सांगून राष्ट्रवादीच्या उत्साहावर पाणी टाकले. आम्ही केलेल्या मागणीमागे कोणतेही राजकारण नाही. वर्षभरापूर्वीच आम्ही तसे पत्र केंद्र सरकारला पाठविले आहे. सामाजिक समता वर्ष साजरे करण्याचा निर्णयही आम्ही आता निवडणुका डोळय़ांसोर ठेवून घेतला नसून तोही एक वर्षापूर्वीच घेतला असल्याचे सांगून माणिकराव ठाकरे यांनी मोठय़ा खुबीने राष्ट्रवादी काँग्रेसवर कडी केली आहे.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या नामांतरास स्पष्टपणे विरोध करताच राज आणि रामदास आठवले यांच्यामध्ये चांगलाच खटका उडाला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. नामांतरास विरोध करताना राज ठाकरे म्हणाले,असल्या भावनिक मुद्दय़ाने दलितांचे कल्याण होणार नाही. दादर रेल्वेस्थानकास आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव दिले तरी आपला विरोध कायम राहीलअसे त्यांनी सांगितले. त्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र 500 रुपयांच्या नोटेवर छापण्यासाठी शरद पवारांनी केंद्रात आवाज उठवावाअसे आवाहन केले.
 
राज ठाकरे यांच्या विरोधानंतर रामदास आठवले यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन त्यांना विरोध केला. दादरच्या नामांतराला विरोध करायचा असेल तर राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या झेंडय़ातून निळा रंग काढून टाकावाअसे आव्हान त्यांनी दिले. इतके करून आठवले थांबले नाहीत तर राज ठाकरे यांनी नवीन पक्ष काढून आपले काका बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला. निळा रंग काय आठवले यांची खासगी मालमत्ता आहे कायअसा सवाल करून कलानगरच्या बाजूला आठवले यांनी तीन मजल्यांचा बंगला कसा बांधला. त्यासाठी पैसा कुठून आणला. शेजारी राहायला गेल्यापासून रामदास आठवले शिवसेनेच्या प्रवक्त्यासारखे वागत आहेतअसे टीकास्त्र राज ठाकरे यांनी सोडले. मात्र मातोश्रीच्या बांधकामासाठी पैसा कुठून आणलाअसा प्रश्न त्यांनी आपल्या काकांना कधी विचारला नाही.
 
दलित चळवळीतील विचारवंत राजा ढाले यांनी या सर्व गोंधळावर मांडलेली मते फार महत्त्वाची आहेत. दादरच्या नामांतरापासून होऊ घातलेल्या शिवशक्ती-भीमशक्तीचाही त्यांनी रोखठोक भाषेत समाचार घेतला आहे. आठवले म्हणजे काही भीमशक्ती नाही. ज्यांनी दलितांची डोकी फोडली त्यांच्यासोबत रामदास आठवले जात आहेत. हे दलित जनतेला कसे मान्य होणाररिपब्लिकन पक्षाचा वापर केवळ पायपुसण्यासारखा केला जात आहेअशी तमाम दलित कार्यकर्त्यांच्या मनात खदखदणारी खंतही त्यांनी व्यक्त केली.

दादरच्या नामांतराचा वाद असा चिघळलेला असताना शिवसेना मात्र मूग गिळून आहे. एवढय़ा सगळय़ा वादात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास आमचा विरोध नव्हताअसे 16 वर्षानी सांगणा-या शिवसेनेने दादरच्या नामांतराबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यांच्या मनात इतका कळवळा आहेतर त्यांनी दादरच्या नामांतराबाबत भूमिका स्पष्ट करावी. शिवसेनेचे हे मौनच मोठे बोलके आहे. मराठवाडा विद्यापीठाप्रमाणेच दादरच्या नामांतरालाही शिवसेनेचा स्पष्टपणे विरोध आहे. मात्र तसे जाहीर केले तर रामदास आठवलेंना बरोबर घेऊन दलित जनतेला भुलविण्याचा जो प्रयोग शिवसेनेने सुरू केला आहेतो यशस्वी होऊ शकणार नाहीम्हणून ते मूग गिळून बसले आहेत. मात्र हे न कळू शकण्याइतकी दलित जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. 

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP