दिल्लीचा गोंधळ बरा होता!
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र ही केवळ रणधुमाळी नाही तर याला फंदफीतुरीबरोबरच गुंडगिरी आणि मारामारीचे स्वरूप आले आहे. यामुळे जो महागोंधळ निर्माण झाला आहे त्यावरून आगामी काळात राजकारण आणखी किती खालच्या पातळीवर जाणार आहे याची कल्पनाच केलेली बरी. कालचा दिल्लीतला गोंधळ बरा होता असे म्हणण्याची वेळ आली आहे.