Monday, October 27, 2014

बुरसटलेल्या मनाचीही साफसफाई करा!


संपूर्ण देशभर दीपावलीचा आनंदोत्सव साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील दूरवरच्या खेड्यात एका दलित कुटुंबातील आईवडील आणि त्यांच्या एकुलत्या एका मुलाची हत्या केली जाते. हे हत्याकांड इतक्या निर्घृणपणे घडवण्यात आले की, १९ वर्षांच्या कोवळ्या मुलाचे तुकडे तुकडे करण्यात आले. तिन्ही प्रेते विहिरीत फेकून देण्यात आली. मानवी शरीराचे असे तुकडे केलेले पाहून कोणत्याही माणसाच्या अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हे क्रौर्य पाहून कोणाही सहृदय माणसाची मान शरमेने खाली जाईल.

Read more...

Monday, October 20, 2014

सत्तापरिवर्तन...काँग्रेसचे पतन!

महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेली कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पकड ढिली होऊन हे दोन्ही पक्ष पराभवाच्या गर्तेत लोटले गेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून शिवसेना-भाजपा युतीचे साडेचार वर्षांचे विरोधी पक्षाचे सरकार वगळता राज्यावर कायम कॉँग्रेसचेच वर्चस्व राहिले. परंतु गेल्या १५ वर्षांच्या आघाडीच्या कालखंडात मंत्र्यांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपाने सरकारची बदनामी होत राहिली. 

Read more...

Thursday, October 16, 2014

पोस्टर लय भारी, रिकामी तिकीट बारी!


विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. ठिकठिकाणी प्रमुख पक्षांच्या नेत्यांची पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. पोस्टर्स, होर्डिंग्ज, वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयसुरू आहे. भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे अशा स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांचा धुमाकूळ महाराष्ट्रभर सुरू आहे. या सर्व पक्षांच्या पोस्टर बॉईजना आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार, अशी स्वप्ने पडू लागली आहेत. 

Read more...

Monday, October 6, 2014

नेत्यांनी केली आंबेडकरी चळवळीची वाताहत

यंदाची विधानसभा निवडणूक म्हणजे जनतेच्या मनोरंजनाचा मोठा धमाका असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची संख्या पाहता बहुरंगी लढतींनी चांगलीच रंगत येणार आहे. कोण नंबर एक आणि कोण नंबर दोन याचे आडाखे बांधले जात आहेत. निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे आकडे पाहिले, तर गोंधळाची परिस्थिती दिसून येत आहे. युती आणि आघाडी यांची फाटाफूट झाल्यामुळे तेही गोंधळलेले आहेत. यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाच्या पक्षाचा जो गोंधळ झाला, त्याचीही भर पडली. 

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP