गांधीगिरी.. लगे रहो
सर्वोच्च न्यायालयाने दिलेली शिक्षाही केवळ स्फोट घडवणार्या हातांना दिलेली आहे. मेंदू अद्यापि देशाबाहेरच आहे. त्याला अटक करण्यासाठी सर्वांनी आवाज उठविला पाहिजे. दबाव निर्माण केला पाहिजे. पण ते सोडून संजूबाबाची शिक्षा माफ करण्यासाठी आकांत सुरू आहे. त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याने भोगावी, तावून-सुलाखून बाहेर यावे, गांधीगीरी सिनेमात नव्हे प्रत्यक्षात आचरणात आणावी, अशी लोकांची अपेक्षा आहे.