पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल खाप पंचायतीकडे
महिलांवरील अन्याय, अत्याचाराचे सत्र सुरूच आहे.
पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणार्या घटना सतत घडतच आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एका सरपंच महिलेला ग्रामपंचायतीच्याच
सदस्याने भरसभेत केलेली मारहाण आणि विनयभंग या
घृणास्पद प्रकाराचा तीव्र निषेध करावा तेवढा थोडा आहे. अहमदनगर जिल्हा हा मानवतेला काळिमा फासणारा, सामाजिकदृष्ट्या मागासलेला आणि गुन्हेगारीचा
अड्डा असल्याची इतिहासात नोंद होईल अशा घटना येथे घडू लागल्या आहेत.