मराठा आरक्षणाचा फायदा कोणाला?
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या पहिल्याच भाषणात हे राज्य मराठय़ांचे की मराठींचे, ही शंका दूर करताना आपण मुख्यमंत्री असेपर्यंत हे राज्य मराठींचे असेल, असे उद्गार काढले होते; परंतु आज हे राज्य मराठींचे नसून मराठय़ांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यशवंतरावांच्या विचारापासून देखील नेते दुरावत गेले. राज्य मराठींचे होऊ शकले नसल्याचा फायदा शिवसेना आणि मनसे या पक्षांनी उचलला. त्यांनी मराठी माणूस आणि मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता असल्याचे सांगून मराठी माणसांचा विश्वास मिळवण्याचा प्रय▪केला.