Monday, September 30, 2013

कॉमन मॅन हाच राहुल गांधींचा अजेंडा

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने कलंकित लोकप्रतिनिधींना अभय देणारा काढलेला वटहुकूम फाडून फेकून देण्याच्या लायकीचा असल्याचे आक्रमक वक्तव्य करणारे राहुल गांधी भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न पाहू लागले आहेत. तसेच गोरगरीबांना विश्‍वास देण्याचा प्रय▪करू लागले आहेत. कॉँग्रेचे ते भावी पंतप्रधान आहेत की नाही, हे स्पष्ट झालेले नाही आणि राहुल गांधींनाही कसली घाई झालेली नाही. याचा प्रयत्य गेल्या सप्ताहात आला.


Read more...

Monday, September 23, 2013

राजकारण्यांना व्हायचंय क्रिकेटसम्राट!

महाराष्ट्रातील राजकारणात सहकारसम्राट, उद्योगसम्राट, साखरसम्राट, शिक्षणसम्राट यांची काही कमी नाही. त्यात आता क्रिकेटसम्राटांची भर पडू लागली आहे. सर्व राजकीय पक्षांमधील जो तो नेता क्रिकेटसम्राट होण्यासाठी धडपड करू लागला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे राजकीय खेळय़ा करण्यात तरबेज असल्यामुळे त्यांना खेळाचे कोणतेही क्षेत्र वज्र्य नाही. राजकारणातील खेळय़ांप्रमाणे सर्व खेळ क्षेत्रांमध्ये ते लिलया वावरत असतात. त्यामुळे त्यांनी क्रिकेटमध्ये रस घेणे समजू शकते; पण आज जो तो नेता उठतो आणि क्रीडा क्षेत्रातील संघटना ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. सर्व क्षेत्रांत राजकारणी असलेच पाहिजेत, असा अट्टाहास ते करू लागले आहेत. खो-खो, कबड्डी, कुस्ती यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त क्रिकेटप्रेम वाढू लागले आहे. क्रिकेटएवढा पैसा अन्य खेळांमध्ये नसल्यामुळे त्या खेळांना दुय्यम स्थान दिले जात आहे. कोणतेही क्षेत्र सर्वसामान्य क्रीडाप्रेमींसाठी मोकळे सोडायचे नाही, या निर्धाराने राजकारण्यांचा सर्वत्र संचार होऊ लागला आहे. भरपूर पैसा कमावण्याचा सोपा मार्ग क्रिकेटच्या मैदानातून जात असल्यामुळे या लोकांनी क्रिकेट संघटना ताब्यात घेण्याचा चंग बांधला आहे. क्रिकेट सेवा हीच जणू काही जनसेवा आणि क्रिकेटप्रेम हे राष्ट्रप्रेम असल्याच्या थाटात राजकारणी वावरू लागले आहेत.

Read more...

Monday, September 16, 2013

बाबांचा चकवा, राष्ट्रवादीलाच लकवा

आपल्यावर टीका करणार्‍या नेत्यांना त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देण्याऐवजी कृतीने त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले असल्याने त्यांची प्रतिमा उजळून निघाली आहे हे निश्‍चित. राष्ट्रवादीला चकवा देत त्यांची नियमबाह्यकामे बाजूला सारण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीने राष्ट्रवादीलाच लकवा झाल्याचे चित्र दिसत आहे.

Read more...

Monday, September 9, 2013

सरकारची प्रलोभने आणि आजोबाची गोष्ट


लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर सरकारविरोधी वातावरण तयार होऊ लागते. आघाडी सरकारला सत्तेत येऊन १४ वर्षे झाली. या १४ वर्षांत मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यात आले नाही.

Read more...

Monday, September 2, 2013

'नाहीरें'साठी सोनियांची विधायक क्रांती

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्याची क्षमता असलेल्या या भागातील दुर्बल घटकांना जर योजनेबाहेर ठेवावे लागले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था काय होईल, याची चिंता सत्ताधार्‍यांना लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री चव्हाण यांनी दीड कोटी जणांना अन्न सुरक्षा कवच देण्यासंदर्भात मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीने आढावा घेऊन निर्णयाप्रत येण्यास किमान दोन महिन्यांचा अवधी लागेल.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP