Monday, July 28, 2014

आदिवासी-धनगरांच्या कात्रीत सरकार!

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होण्याआधी मराठा-मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मार्गी लावला. आता धनगर, लिंगायत या जाती पुढे आल्या आहेत. धनगरांनी तर मंत्रालय हादरून टाकणारे आमरण उपोषण आंदोनल सुरू केले आहे. मराठी-अमराठी, हिंदू-मुस्लीम या वादांनी राजकारण वादग्रस्त बनून समाजा-समाजामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. या पुढील काळात जाती-जातींमध्ये आरक्षणाच्या मुद्दय़ावरून विद्वेष पसरू लागला आहे. ही प्रकरणे वाढली तर जाती-जातींमध्ये यादवी माजून तुंबळ युद्धे होतील की काय, असे वाटू लागले आहे. सर्वच जातींना आरक्षणाचे जास्तीत जास्त लाभ पदरात पाडून घ्यायचे आहेत. त्यामुळे सर्वजण एकमेकांविरुद्ध उभे राहून महाराष्ट्रात भडका उडेल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शासकीय सेवा भरती आणि शिक्षणाबरोबरच राजकीय आरक्षणावर डोळा असल्यामुळे सगळा आटापिटा चालला आहे.

Read more...

Monday, July 21, 2014

नारायण राणेंच्या बंडाचे काय होणार?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास जेमतेम महिनाभराचा अवधी उरलेला असताना सत्ताधारी कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले आणि राजकीय वातावरण तापले. गेले काही दिवस राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याचे वृत्त येऊ लागले. भुजबळांनी या वृत्ताचा इन्कार केला, मात्र आपल्या सर्मथकांची फौज शिवसेनेत पाठवून दिली. पुढे-मागे काय होईल, हे काळ ठरवेल; परंतु बंडाच्या पवित्र्यात असलेल्या भुजबळांचे नाव आपोआप मागे पडले, याला कारणही तसेच घडले. 

Read more...

Monday, July 14, 2014

गजबजलेल्या वस्तीतून हलवा श्रद्धास्थळे !

भाविकांच्या तसेच नागरिकांच्या जीवाला धोका असेल आणि दहशतवाद्यांना रोखण्याचे ठोस उपाय होत नसतील तर अशी मंदिरे सुरक्षितस्थळी हलवणेच योग्य ठरेल. मंदिरांना तसेच भाविकांच्या जीवाला धोका होणार असेल तर मंदिरे सुरक्षित स्थळी हलवावीत; अन्यथा गजबजलेल्या वस्त्या हटवून मंदिरे तरी सुरक्षित करावीत. या मुद्दय़ाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.

Read more...

Monday, July 7, 2014

पाणी बचतीचा चिनी प्रवाह

जिथे पाणी आहे तिथे मुबलक वापर होत आहे, अनेक ठिकाणी नळ उघडे ठेवून घराबाहेर जाणार्‍यांची संख्या कमी नाही. असा बेशिस्त वापर होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात मात्र पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन महिलांना आजही मैलोन् मैल पायपीट करावी लागत आहे.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP