नवे वर्ष, नवी स्वप्ने, नवा उन्माद
देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव करून भारतीय जनता पक्षाचे सरकार विराजमान झाले. जनतेला विकासाची नवी स्वप्ने दाखवून गेल्या
६५ वर्षांची काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणण्यात नरेंद्र मोदींना यश आले.
काँग्रेसच्या गांधी-नेहरू घराण्यांनी कायम सत्ता हातात ठेवून घराणेशाहीचा
ठपका ओढवून घेतला. या घराणेशाहीचा तसेच काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा
घराघरांत पोहचवून मोदींनी काँग्रेसला पुरते लोळवले.