अखेर 'आदर्श'चे 'भूत' उतरवले!
अशोकरावांनी राष्ट्रवादीच्या सर्व 'अर्थपूर्ण' फायली रोखून धरल्या आणि राष्ट्रवादीवाले चांगलेच संतापले. त्याचप्रकारे पृथ्वीराजबाबांनी राष्ट्रवादीला लगाम घालण्यास सुरुवात करून नेतृत्वाची चमक दाखवली. पुढील काळात काँग्रेसला ताकद द्यायची असेल तर अशोक चव्हाणांचे नाव आघाडीवर राहू शकते. अशोकरावांच्या बहुचर्चित पुनर्वसनाचा काँग्रेसला फायदा होईल की तोटा, हे निकालानंतरच समजून येईल. आज तरी महाराष्ट्रात विलासरावांनंतर कोण? या प्रश्नाचे उत्तर अशोकरावांच्या पुनर्वसनात दडले आहे.