बिल्डरशाहीचा दबाव झुगारून लोकाभिमुख कामांना प्राधान्य
पुणे/राही भिडे- राजकारणी आणि बिल्डरांचा दबाव झुगारून देत लोकाभिमुख कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करतानाच आजपर्यंत करोडो रुपये खर्च करूनही महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला कसा नाही, असा रोखठोक सवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांना विकासाच्या मुद्दय़ांवर आव्हान देऊन त्यांचा पर्दाफाश करण्याचे सूतोवाचही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.