Monday, May 27, 2013

शरद पवारांचा मुस्लीम नारा!


१९९५ सालची विधानसभा निवडणूक पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली होती; पण मुस्लिमांनी त्यांना मते दिली नाहीत. उलट मुस्लिमांची वस्ती असलेल्या मुंबईतल्या अनेक मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार विजयी झाले होते. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी त्यांना विश्‍वास देणे गरजेचे आहे; पण विश्‍वास आणि शरद पवार हे समीकरण जुळत नाही, हे सर्वांना माहीत आहे.पुरोगामित्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकारण करणार्‍या शरद पवारांनी मुस्लीम अल्पसंख्याकांचे तारणहार असल्याचा संदेश देण्यासाठी मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनचा आधार घेतला आहे. कठीणसमयी माणसे मिळेल तो आधार घेत असतात. मुस्लीमबहुल मुंब्रा येथे जाऊन नागरिकांना सर्वसमस्यामुक्त करण्याचे आश्‍वासन देऊन त्यांनी तेथून स्लो लोकल पकडली आणि कळवा गाठले. दलित मुस्लीम ही काँग्रेसची व्होट बँक असून ही व्होट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांनी सतत वेगवेगळे प्रयत्न केले आहेत. 

Read more...

Monday, May 20, 2013

आकाश फाटलंय, ठिगळं कुठे लावणार?

कोणत्याही नेत्यावर आरोप झाले की राजकारणातल्या शहकाटशहाचा हा परिणाम असल्याचे निगरगट्टपणे सांगितले जाते; परंतु समाजहितासाठी, लोकांच्या करांमधून जमा झालेला सरकारी पैसा हडप करून तो स्वत:च्या लॉकरमध्ये ठेवायचा. पत्नी, मुलांच्या, नातेवाइकांच्या नावावर ठेवायचा. दागदागिने, जमीनजुमल्यात गुंतवायचा. अशा भ्रष्टाचार्‍यांना कठोर शासन करण्याची भूमिका घेण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार होतो, तेव्हाच धूर निघतो आणि कुठेतरी आग असल्याचा संशय वाढतो.

Read more...

Monday, May 13, 2013

मुख्यमंत्री महाराष्ट्रात स्वस्थ, विरोधक अस्वस्थ


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचा दणदणीत पराभव केला. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या भाजपा सरकारला खाली खेचून तेथील जनतेने काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मते टाकली. या निवडणूक निकालानंतर चार राज्यांच्या आगामी निवडणुका, लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये काय होईल, याची चर्चा सुरू झाली. सर्वच प्रसिद्धीमाध्यमे आणि राजकीय पंडितांनी कर्नाटकच्या निकालावरून पुढील निकालाचा अंदाज बांधणे योग्य नसल्याचा निर्वाळा दिला आहे. 

Read more...

Monday, May 6, 2013

शासन-प्रशासन शीतयुद्ध सुरूच

मुख्यमंत्री चव्हाण यांना भ्रष्टाचार दूर करावयाचा असल्याने त्यांना कामाची एकूण पद्धत बदलायची आहे. भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही असे नियम करायचे आहेत. त्यामुळे कामांना विलंब होत असून, आपले काम सद्सद्बुद्धीने चालले असल्याने मुख्यमंत्री समाधानी असतीलही; पण सर्वत्र शीतयुद्ध सुरू आहे.


Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP