Tuesday, September 30, 2014

सत्तेसाठी वाट्टेल ते..!

महाराष्ट्रात सत्तेचे स्वयंवर होणार आहे. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. सत्ता वरणार कुणाला, कोणाच्या गळ्यात विजयश्रीची माळ घालणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राजे -राजवाड्यांच्या काळात स्वयंवरासाठी जमलेल्यांवर लाह्यांचा वर्षाव होत असे. आज सर्वपक्षीय उमेदवार ऐकमेकांवर शिव्यांची लाखोली वाहत स्वयंवराच्या प्रतीक्षेत आहेत. स्वयंवराची तयारी सुरू झाली आहे. सत्ता मिळवणार कोण याबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण झाले आहे..

Read more...

Monday, September 22, 2014

सर्वांनाच व्हायचंय नंबर वन!

विधानसभा निवडणुकांचे नगारे जोरजोरात वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ सात दिवसांचा अवधी उरला असून युती-आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे इच्छुकांचा रक्तदाब वाढू लागला आहे आणि कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. हा तिढा सुटत नसेल तर स्वबळावर जागा लढवा, असा दबाव कार्यकर्ते वाढवू लागले आहेत.

Read more...

Monday, September 15, 2014

मुंडेंच्या वारसदाराला सीएम करणार का?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच सरकार स्थापनेची उत्सुकता वाढू लागली. पुढील महिन्याच्या १५ तारखेला मतदान होऊन १९ तारखेला लगेच निकाल लागणार असल्याने या राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण? याची स्पर्धा राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली आहे. प्रत्येकानेच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उडी मारून धावण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार आणि तो मीच होणार, अशी स्वप्ने पडू लागली आहेत. 

Read more...

Monday, September 8, 2014

शिक्षणाकडून राजकारणाकडे : मोदींचे व्हिजन


शिक्षक दिनानिमित्त हेडमास्टर नव्हे तर स्वत:ला टास्क मास्टर म्हणवून घेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणाकडून राजकारणाकडे जाण्याचे अफलातून व्हिजन देशासमोर ठेवले आहे. त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी शिकवणी तर दिलीच; पण अप्रत्यक्षपणे राजकारण्यांचीही चांगलीच सुनावणी घेतली. पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीची दूरदृष्टी, त्याचे व्हिजन कसे असावे याचे प्रात्यक्षिकच त्यांनी देशाला करून दाखवले. याअगोदर देशात डझनभर पंतप्रधान झाले; परंतु देशभरातील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा प्रय▪आतापर्यंत कोणीही केला नाही. त्यामुळे मोदींचा हा नवा प्रयोग सर्वांनाच भावला.

Read more...

Monday, September 1, 2014

जनतेला गृहीत धरू नका..

देशातील पोटनिवडणुकांनी फुगा फोडून टाकला आहे. याचा बोध महाराष्ट्रातील युतीच्या नेत्यांनी घेण्याऐवजी प्रत्येक जण एकमेकांसमोर दंड थोपटून उभा राहिला आहे. पोटनिवडणुकीच्या निकालांनी जनतेला राजकीय नेत्यांनी कायम गृहीत धरू नये, हा संदेश दिला आहे.

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP