Monday, November 26, 2012

मुंबई-पुण्यासह अयोध्येतही स्मारक व्हावे!

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक करायचे कुठे? यावरून वाद सुरू झाला आहे. स्मारक करण्यासाठी योग्य जागा कोणती, याबाबत मतमतांतरे होऊ लागली आहेत. शिवाजी पार्क मैदान, महापौर बंगला, कोहिनूर मिल तसेच त्यांची जन्मभूमी पुण्यनगरी या ठिकाणांसाठी मागण्या पुढे आल्या आहेत. याबरोबरच महाराष्ट्राबाहेर विशेषत: उत्तरेतील अयोध्येत बाळासाहेबांचे स्मारक का होऊ नये? कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करून बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घेण्याची हिंमत बाळासाहेबांनी दाखवली. त्याच रात्रीत ते कोटय़वधी हिंदूंचे हृदयसम्राट झाले. 

Read more...

Monday, November 19, 2012

सैनिकहो तुमच्यासाठी..

एखादा वटवृक्ष उन्मळून पडावा आणि त्याच्या सावलीत आश्रय घेणारे, आधार शोधणारे, दु:ख विसरणारे अशी सर्व माणसे, लहान-थोर बायाबापुडे, प्राणिमात्र यांची दाणादाण उडावी, सर्व जण हवालदिल व्हावेत असे काहीसे महाराष्ट्रात घडले. या राज्यातील जनतेच्या हृदयात अढळ स्थान मिळवलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे युगपुरुष होते. 

Read more...

Monday, November 12, 2012

थोडी खुशी, जादा गम

पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी आले त्या वेळची परिस्थिती अतिशय गंभीर होती. केंद्र आणि राज्यांमध्ये सर्वत्र गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होऊ लागली. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. राज्यात चांगले काही घडत नाही. सर्वत्र अंदाधुंद, मनमानी कारभार सुरू आहे. सर्व राजकारणी भ्रष्ट आहेत, अनेक प्रकरणांचा पाठपुरावा होऊ लागला, पुरावे दिले जाऊ लागले, प्रकरणे हजारो कोटी रुपयांची असल्याने लोकांच्या मनातही शंका-कुशंका निर्माण होऊ लागल्या. त्यात थेट तत्कालीन मुख्यमंर्त्यांचा कथीत संबंध असलेला 'आदर्श घोटाळा' देशभर गाजू लागला. 


Read more...

Monday, November 5, 2012

दोघांत नाही एकमत, तरी हवे जनमत!

राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सतत कलगीतुरा रंगू लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या दोन पक्षांची आघाडी नसल्याने निवडणूक प्रचारात तू-तू,मै-मै चा फॉम्यरुला कायम असल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील डहाणू नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात याचा प्रत्यय आला. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप चांगलेच गाजले. 

Read more...

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP