Monday, February 25, 2013

कदम, कदम बढाये जा..


राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. गावे ओसाड होऊ लागली आहेत. शहरांमध्ये स्थलांतर होऊ लागले आहे. मुंबई-पुणे शहरांमध्ये डोक्यावर गाठोडे घेतलेले, विसाव्याला रस्त्याच्या कडेला टेकलेले खेडूत दिसू लागले आहेत. बाया बापुडे, मुलंबाळे पाण्यासाठी वणवण करू लागले आहेत, पिण्याचे पाणी आणि उदरभरणासाठी चार घास कसे मिळतील याच्या विवंचनेत या लोकांची भ्रमंती चालू आहे. 

Tuesday, February 19, 2013

दुष्काळाचाही होतोय 'इव्हेंट'

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पिण्याचे पाणी 15-15 दिवस मिळत नाही, अशी भयावह परिस्थिती आज फेब्रुवारी महिन्यातच निर्माण झाली आहे. मार्च, एपिल्र, मे हे पुढील तीन महिने कडकडीत उन्हाळय़ाचे त्यातच 'नेमेचि येतो पावसाळा' हा वाक्प्रचार ग्लोबल वॉर्मिगने खोटा ठरवला आहे. त्यामुळे जून महिन्यातही नेहमीप्रमाणे पाऊस पडेल याची शाश्वती नाही. अशावेळी राजकारण्यांनी आणि विशेषत: राज्यकत्र्यांनी परिस्थिती अधिक गांभिर्याने हाताळण्याची गरज आहे. 

Monday, February 11, 2013

'ताईगिरी'ने केली आघाडीत बिघाडी!

महिलांनी पूर्वीच्या मराठी चित्रपटातील नटय़ांप्रमाणे सोज्वळ, विनम्र, रडूबाई राहावे, अशी अपेक्षा नाही. आज महिला बंडखोर, सक्षम, स्वाभिमानी बनल्या आहेत. त्याचबरोबर दुसर्‍यांचाही आदर केला पाहिजे. नेता बनू इच्छिणार्‍या महिलांवर तर जास्त जबाबदारी आहे; पण रेडीमेड नेत्यांना याचे भान राहत नाही.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना मिळालेले 50 टक्के आरक्षण, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मिळालेले बळ आणि शैक्षणिक प्रगतीमुळे महिलांची विविध क्षेत्रात सुरू असलेली घोडदौड यामुळे महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण आणि पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची क्षमता याचा सर्वत्र बोलबाला सुरू झाला आहे. 

Monday, February 4, 2013

आता राजकारण्यांचे वर्‍हाड लंडनला!

राजकारण्यांनी व्यक्तीकेंद्री किती व्हावे याचे भान राखले पाहिजे. इंग्लंड, अमेरिकेत जाऊन बेनामी मालमत्ता खरेदी करण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. पुण्याचे नानासाहेब गोरे हे लंडनमध्ये उच्चायुक्त असतानाही तिथे पायीपायी फिरत असत, आजचे राजकारणी मतदारसंघात हेलिकॉप्टर शिवाय जात नाहीत.प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे 'वर्‍हाड निघलंय लंडनला' हे नाटक महाराष्ट्रातच नव्हे तर देश-परदेशात चांगलेच गाजले. ज्येष्ठ नाटककार आणि नाटय़संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेल्या प्रा. देशपांडेंनी आपल्या हयातीत निर्माण केलेल्या अनेक नाटय़कृतींमध्ये 'वर्‍हाड.' सर्वाच्या कायम स्मरणात राहिले आहे. 

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP