Monday, November 25, 2013

लैंगिक शोषणाचा तहलका

समाजातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार, गैरवर्तणूक, अत्याचार, शोषण यांचा सबळ पुराव्यानिशी पर्दाफाश करून गैरकृत्य वेशीवर टांगणार्‍या आणि देशभर खळबळ उडवून देणार्‍या 'तहलका'कारावरच अशा प्रकारचा आरोप झाल्याचे प्रकरण सध्या गरमागरम चर्चेचे विषय बनले आहे. तहलका मासिकाच्या तरुण तेजपाल नामक संपादकाने आपल्या कार्यालयातील २३ वर्षीय महिला पत्रकारावर बलात्कार केल्याचे प्रकरण पुढे आले आणि एकच 'तहलका' माजला. महिलांवरील अन्याय-अत्याचार-बलात्काराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कालच्या रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांची सुरक्षितता, अन्याय-अत्याचार आणि माध्यमांची संवेदनशीलता यावर महिला पत्रकार संघाने आयोजित परिषदेमध्ये बरेच विचारमंथन झाले.

Monday, November 18, 2013

नाही मनोहर तरी..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे भवितव्य काय? असा प्रश्न उभा राहणे साहजिक आहे. बाळासाहेबांचा करिश्मा आणि त्यांचा जनमानसावर असलेला प्रभाव यामुळे संघटना मजबूत झाली होती. मित्रपक्ष भाजपाच्या सहकार्याने का होईना, पण महाराष्ट्रात प्रथमच विरोधी पक्षाचे सरकार आणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. बाळासाहेबांसारखा वैयक्तिक प्रभाव शिवसेनेच्या अन्य कोणत्याही नेत्यांमध्ये नसल्यामुळे एकचालकानुवर्ती असलेली शिवसेना भविष्यकाळात टिकून राहू शकेल का? असा प्रश्न पडतो. बाळासाहेबांची आक्रमकता, परखडपणा आणि ठाकरी भाषा हे गुण राज यांच्यामध्ये असल्यामुळे शिवसैनिक आणि मोठय़ा प्रमाणात तरुण वर्ग मनसेकडे आकर्षित झाला. त्यामुळे शिवसेनेची घसरण होत राहिली, ती रोखण्याची ताकद उद्धव यांच्या शांत मवाळ व्यक्तिमत्त्वात नाही. ठोकशाहीवर उभ्या असलेल्या शिवसेनेचा कायापालट होऊन ती सत्तेनंतर लोकशाही पद्धतीनुसार टिकविण्याचा प्रय▪फारसा यशस्वी झाला आहे, असे दिसत नाही.

Monday, November 11, 2013

सत्ताधारी आघाडीत मुख्यमंत्र्यांची सरशी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात येऊन आज तीन वर्षे पूर्ण झाली. 'आदर्श'घोटाळ्याने राज्याची प्रतिष्ठा धोक्यात आल्यामुळे स्वच्छ प्रतिमा, शिस्त व अभ्यासू वृत्ती असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना येथे पाठवण्यात आले. दिल्लीच्या वातावरणात रुळलेल्या मुख्यमंत्र्यांचा सुरुवातीचा बराच वेळ काम समजून घेण्यात गेला, अभ्यासाने आकलन होत गेले आणि मुख्यमंत्र्यांनी कामाला सुरुवात केली. 

Monday, November 4, 2013

दिवाळीची निराळीच आतषबाजी!


देशभर दिवाळीची धूम सुरू आहे. दिव्यांच्या रोषणाईबरोबरच फटाक्यांच्या आतषबाजीने अवघा आसमंत प्रकाशमान झाला आहे. शुक्रवारी सेन्सेक्सने विक्रमी उसळी मारून रेकॉर्डब्रेक केला असताना रविवारच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी फटाक्यांनी उच्चांक गाठला. इकडे राजकारणात खास 'लक्ष्मीपूजन' आणि एका पाठोपाठ होणारे शाब्दिक स्फोट यामुळे वातावरण गरमागरम झाले आहे.

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP