Saturday, March 28, 2015

काँग्रेस-शिवसेनामुक्त महाराष्ट्र अभियान

राष्ट्रवादी आणि भाजपा हे दोन्ही पक्ष राज्याला काँग्रेसमुक्त करण्यासाठी एकत्र आले आहेत,
असे या दोन्ही पक्षांनी जाहीर केले आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी राष्ट्रवादीला जवळ
करण्याचे धोरण हा पहिला टप्पा असला, तरी प्रादेशिक पक्ष संपवणे हा दुसरा टप्पा आहे़
भाजपाला काँग्रेससह शिवसेनामुक्त महाराष्ट्र करायचा असून प्रादेशिक पक्ष संपवण्याची भीष्म
प्रतिज्ञा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच केली आहे...

Friday, March 27, 2015

खेकडा प्रवृत्तीने केला काँग्रेसचा र्‍हास


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आत्मचिंतन करून, चुका दुरुस्त करून जोरात कामाला लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु ज्या तरुण नेतृत्वाच्या खांद्यावर ही जबाबदारी आली होती,ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अचानक अज्ञातवासात निघून गेले. ते सुट्टीवर गेल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात फेरबदल करण्यात आले. प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण आणि मुंबई प्रदेश अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती करण्यात आली. हे दोघे जण कार्यकर्त्यांचे मनोबल कसे वाढवू शकतील, हे येत्या काही काळात दिसून येईलच;परंतु चव्हाण-निरुपम यांच्या नियुक्तीने काँग्रेस पक्षात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेस जिवंत ठेवायची कशी? असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे.

राजकारण्यांच्या वरदहस्ताने वाळूमाफियांचा धुडगूस


महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये वाळूमाफियांनी धुडगूस घातला असून त्याला आळा
 घालण्यासाठी सरकारने माफियांना एमपीडीए कायदा (महाराष्ट्र प्रोहिबिशन आॅफ डेंजरस
अ‍ॅक्टिव्हिटीज अर्थात महाराष्ट्र प्रतिबंध धोकादायक उपक्रम कायदा) लागू करण्याचा निर्णय घेतला
आहे़ महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी विधिमंडळात यासंबंधीची घोषणा केली आहे़
टीव्ही ९ या वृत्तवाहिनीच्या जालना येथील प्रतिनिधीवर वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केल्यामुळे
हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला़ याची तीव्र प्रतिक्रिया विधिमंडळ व संसदेत उमटली़

Tuesday, March 10, 2015

खेकडा प्रवृत्तीने केला काँग्रेसचा ºहास

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्ष आत्मचिंतन करून, चुका दुुरुस्त करून जोरात कामाला लागेल, अशी अपेक्षा होती़ परंतु ज्या तरुण नेतृत्वाच्या खांद्यावर ही जबाबदारी आली होती,ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अचानक अज्ञातवासात निघून गेले़ ते सुट्टीवर गेल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात फेरबदल करण्यात आले़ प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण आणि मुंबई प्रदेश अध्यक्षपदी संजय निरुपम यांची नियुक्ती करण्यात आली़ हे दोघे जण कार्यकर्त्यांचे मनोबल कसे वाढवू शकतील, हे येत्या काही काळात दिसून येईलच;परंतु चव्हाण-निरुपम यांच्या नियुक्तीने काँग्रेस पक्षात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे़ काँग्रेस जिवंत ठेवायची कशी? असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे़

Tuesday, March 3, 2015

भूसंपादनावरून काहूर; युवराज गेले सुट्टीवर


काँग्रेस­राष्ट्रवादीमध्ये असलेला हा विरोधाभास भविष्यातील यशापयशाची नांदी असल्याचे दिसत आहे़ खरे पाहता भूसंपादन कायद्याविरुद्ध या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज होती; पण त्यांच्या भूमिकाच वेगळ्या असल्यामुळे हे दोन पक्ष एकजुटीने शेतकºयांच्या बाजूने उभे राहू शकले नाहीत़


About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP