Monday, April 29, 2013

निवडणुकीत शरद पवारांची सत्त्वपरीक्षा

मागील लोकसभा निवडणुकीआधी शेतकर्‍यांना हजारो कोटींचे पॅकेज दिले. सवलती दिल्या पण मतांमध्ये परावर्तीत झाले नाही. या वेळी ऐन दुष्काळातही मागेल त्याला मदत करण्याचे धोरण ठेवले आहे. पण कुठेच चैतन्य दिसत नाही. त्या तुलनेत शांतपणे बसलेल्या काँग्रेसचा आलेख राष्ट्रवादीच्या पुढे गेला आहे. त्यामुळे काँग्रेसला मागे सारून राष्ट्रवादीला पुढे नेण्याची सत्त्वपरीक्षा पवारांना या वेळी द्यावी लागणार आहे. अपेक्षेप्रमाणे खासदार निवडून आले नाहीत तर तिसर्‍या, चौथ्या आघाडीचे प्रयोग करणार कसे.

Sunday, April 21, 2013

बेलगाम बिल्डरांना दाखवा कायद्याचा बडगा!

महाराष्ट्र सरकारने बिल्डरांच्या मनमानीला लगाम घालण्याकरिता महाराष्ट्र गृहनिर्माण नियामक प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. टेलिफोन नियामक प्राधिकरण, विमान नियामक प्राधिकरण, वीज नियामक प्राधिकरण अशा प्रकारांची सेवा पुरवठादारांवर निर्बंध आणणारी प्राधिकरणे आहेत. त्याप्रमाणे बिल्डरदेखील सेवा पुरवठादार असल्याने त्यांनाही स्वतंत्र प्राधिकरणाखाली आणले पाहिजे. 

Monday, April 15, 2013

मानेंनी ओलांडली लक्ष्मणरेषा

पहिली तक्रार होताच मानेंनी पोलीस ठाण्यात जायला हवे होते. तसे न करता त्यांनी स्वत:बद्दल संशय वाढवून ठेवला. सामाजिक भान न ठेवता त्यांनी असहाय्य महिलांशी अश्लाघ्य वर्तन करून सर्व र्मयादांचे उल्लंघन केले आहे. सार्वजनिक जीवनातील पद्मश्रीसह सर्व प्रकारचे मानसन्मान त्यांना मिळाले, पण ते लक्ष्मणरेषा विसरले. भटक्या-विमुक्त समाजातील मानेंचे जन्मगाव नेमके कुठले आहे, त्याचा पत्ता नाही. आज मात्र ते महाराष्ट्रात सगळीकडेच 'उपरा' ठरले आहेत.

Monday, April 8, 2013

कॉँग्रेसचे जनताजनार्दन चांदूरकर..



मुख्यमंत्री चव्हाण, मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष चांदूरकर आणि महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व पाहता निवडणुकीच्या राजकारणात ते कसा काय प्रभाव पाडतील, हा प्रश्नच आहे. हे तीनही नेते कॉँग्रेससाठी उपयोगाचे नाहीत तर त्यांना आणले कशासाठी?सव्वाशे वर्षांची परंपरा आणि राजकारणाचा सर्वाधिक अनुभव असलेल्या कॉँग्रेसने अशी माणसे मोक्याच्या ठिकाणी कशासाठी बसवली आहेत.

Monday, April 1, 2013

सुरेशदादांच्या जामिनासाठी टाहो..


करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेले सुरेश कलमाडी, ए. राजा, कन्नीमोळी यांच्यासारखे मंत्री तुरुंगातून बाहेर येतात आणि सुरेश जैन हे बहिणीच्या अंत्यसंस्काराला बाहेर येऊ शकत नाहीत, याची खंत त्यांचे अनेक नातेवाईक बोलून दाखवत होते. सुरेशदादा दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्यांना हवी ती शिक्षा द्या; पण किमान जामिनावर सोडा. त्यांना जामिनावर सोडल्यावर महाराष्ट्रात राहू देऊ नका. दुसर्‍या राज्यात पाठवा; पण त्यांना सोडा!

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP