Monday, October 29, 2012

बाळासाहेबांचे दु:ख हलके करा

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची महाराष्ट्रातील जनतेला सवय झाली आहे. बाळासाहेब काय बोलणार, याची शिवसैनिकांनाच नव्हे, तर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना व कार्यकत्र्यांनाही उत्सुकता लागून राहिलेली असायची. विशेषत: सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अधिक उत्सुकता वाटत असे. सत्ताधारी नेत्यांची, पंतप्रधान, मुख्यमंत्री, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री, राजकीय पक्षाचे अध्यक्ष यांची टिंगलटवाळी आणि नक्कल करून बाळासाहेबांनी दाखविली की हास्याचे एकापाठोपाठ स्फोट व्हायचे आणि शिवतीर्थावर आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण निर्माण व्हायचे.


Monday, October 22, 2012

राजकारणी कितीही झाले भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ

देशात सर्वत्र घोटाळे आणि भ्रष्टाचाराची चर्चा सुरू आहे. दररोज सकाळची वृत्तपत्रे पाहिली की, किमान एका तरी राजकारण्याचा घोटाळा उघड झालेला असतो. वृत्तवाहिन्यांवर तर घोटाळय़ांची वृत्ते दिवसरात्र धडधडत असतात. आरोप, घोटाळे आणि खुलासे पाहून लोकांची चांगलीच करमणूक होऊ लागली आहे. हा देश चालवणारे लोकप्रतिनिधी घोटाळेबाज असल्याचे वातावरण निर्माण होत असल्याने भारत देशातील लोकशाहीचे काय होणार? अशी काळजी लोकप्रतिनिधींना वाटू लागली आहे.

Monday, October 15, 2012

मुंडेंना बनवलंय 'लगान'चे आमिर खान

'लगान' चित्रपटात ब्रिटिशांच्या क्रिकेट टीमविरुद्ध मॅच जिंकण्याच्या ईर्षेने आमिर खानने स्वत:ची टीम तयार करून मॅच जिंकण्याची आणि मॅन ऑफ द मॅच होण्याची ज्याप्रमाणे जबाबदारी पार पाडली त्याच प्रमाणे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि व लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांना जबाबदारी पार पाडायची आहे. 

Monday, October 8, 2012

व्यसनमुक्तीसाठी प्रबोधनकारांचा शोध

मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी रांगेत उभे राहून प्रवेशद्वारापाशी असलेल्या कार्यालयातून प्रवेशपत्रिका घ्यावी लागते. मगच प्रवेश मिळतो असा सर्वसाधारण सामान्य माणसांचा समज आहे. किंबहुना लोकांना ही माहिती आहे पण हे काही खरे नाही. असेलच तर अर्धसत्य आहे. 

Monday, October 1, 2012

'मिस्टर क्लीन', महाराष्ट्राला विश्वास द्या!

निर्णय त्वरित घेण्याची क्षमता, त्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्धार आणि त्यावरून निर्माण होणार्‍या संघर्षाचा सामना करण्याची तयारी, असे स्वभावगुण असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वतरुळात तर्कविर्तकांना चांगलेच उधाण आले आहे. 

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP