Tuesday, May 26, 2015

‘मेक इन इंडिया’तून महाराष्ट्र आऊट!

‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ एकाच वेळी कार्यान्वित करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे़ दुसरीकडे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे़ दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे़ ‘मेक इन’ महाराष्ट्रात असो अथवा इंडियात असो, ते होईल तेव्हा होवो; परंतु सर्वसामान्य माणसांना दिलासा मिळेल, अशा एकाही निर्णयाची  मलबजावणी झालेली दिसत नाही

श्रीलंकेतील बुद्ध पौर्णिमा उत्सवाचा बोध

गणपती, नवरात्र आणि महापुरुषांच्या जयंती यांच्यासाठी उत्सवाचे निमित्त साधून कार्यकर्ते वर्गणीच्या नावाने खंडणी गोळा करत असतात़ याला लगाम घालणार कोण? या प्रकाराने चंगळवादाला प्रोत्साहन मिळत असून तरुण पिढी भोगवादी संस्कृतीकडे ढकलली जात आहे़ श्रीलंकेतील उत्सवाप्रमाणे येथील उत्सवांमध्ये
सौजन्य असायला हवे, तरच हे उत्सव एका विशिष्ट जाती धर्माचे न राहता ते सर्वांचे होतील़

पुरोगामी महाराष्ट्र बलात्कारात अव्वल!

महाराष्ट्रात लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या हजारो तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवल्या जात आहेत़ बलात्कार झालेल्या स्त्रियांची उलटतपासणी करणाºया पोलिसांकडून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक
दिली जाते़ महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे आणि महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमण्याची मागणी अद्यापि पूर्ण झालेली नाही़

घोषणांचा सुकाळ, पाण्याचा दुष्काळ

एका महिन्यातच टँकर्सची संख्या दुप्पट झाली असून मार्च महिन्यामध्ये सुमारे साडेपाचशे असलेली
टँकर्सची संख्या ३१ मार्चपर्यंत एका महिन्यातच ११०० वर गेली आहे़ १९९५ साली टँकरमुक्त महाराष्ट्र अशी घोषणा देत सत्तेवर आलेली युती २० वर्षांनंतर सत्तेत आली असून या सरकारसमोर पाणी प्रश्न हे मोठेच
आव्हान आहे़

एमआयएमचा दलित-मुस्लीम फॉर्म्युला फसवा?

औरंगाबादच्या निवडणुकीत एमआयएमने रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनाच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच सेना-भाजपालाही आपली दखल घेण्यास भाग पाडले़ विखुरलेल्या आंबेडकरी जनतेला आक्रमक आणि तडफदार
नेतृत्वाची गरज आहे़ ती उणीव ओवेसी बंधू भरून काढतील, अशी आशा वाटल्याने असंतुष्ट कार्यकर्त्यांनी एमआयएमची वाट धरली आहे़

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP