Monday, October 3, 2011

मनपा निवडणुकीसाठी आघाडीचे डब्ल्यू डब्ल्यू एफ


राज्यातील विरोधी पक्ष निष्प्रभ झालेले असताना आणि विरोधकांचा झंझावात येण्याची शक्यता नसताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अधिक राजकीय प्रगल्भता दाखवणे आवश्यक आहे. पण आघाडीमध्ये असलेल्या आक्रमक घटकांनी, आघाडी तुटेल कशी यावर लक्ष ठेवून काँग्रेसबरोबर कुस्तीचे आव्हान दिले आहे. सध्या शिवसेना-भाजप युतीमध्ये मतभेद वाढू लागले आहेत. शिवसेनेच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी मनसे टपून बसली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या तंबूत जाऊन शिवसेनेला वाकुल्या दाखवल्या असल्याने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा तीळपापड झाला आहे. त्यांच्यातील डब्ल्यू डब्ल्यू एफचा प्रयोग नुकताच पार पडला आहे.

राज्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन महाकाय पेहेलवानांमध्ये फ्री स्टाइल कुस्त्यांची दंगल सुरू झाली आहे. मीच कसा सामर्थ्यशाली आहेहे दाखवण्यासाठी स्वबळाच्या डरकाळय़ा सुरू झाल्या आहेत. खरंतर हे दोन्ही मित्र पक्षतेव्हा यांच्यातील लढाई लुटुपुटूची असेल असे कोणाला वाटू शकते. पण राजकारणातील वास्तव मात्र निराळे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ म्हणजे अधिक ताकदवान. पण धाकटा राष्ट्रवादीच जोरजोरात आव्हान देत सुटला आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजकाल अधिक आक्रमक झाले असूनस्वबळाची भाषा सर्व प्रथम त्यांनीच केली. काँग्रेस पक्ष हा कितीही ताकदवान असला आणि त्याचा दर्जा मोठय़ा भावाचा असला तरी आपण त्याला चितपट करू शकतोअशी भाषा अजितदादांनी सुरू केली. जणू काही मुंबई-ठाण्यासह सर्व निवडणुकांत राष्ट्रवादीची सरशी होणार अशा जबरदस्त आत्मविश्वासाने आणि आक्रमकपणाने आपण काँग्रेसला लोळवू शकतोअसा त्याचा अविर्भाव आहे. पण केवळ डरकाळय़ा फोडून चालत नाहीत. वास्तवाचे भान ठेवावे लागतेअशी समज त्यांना देण्याकरता दस्तुरखुद्द त्याचे काका आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार पुढे आले. काँग्रेस हा आपला मोठा भाऊ आहेअसे अजितदादांच्या मनावर रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण शरद पवारांवर तरी विश्वास ठेवणार कसा. उक्तीप्रमाणे कृती करतील तर त्यांना शरद पवार कसे म्हणायचे. त्यामुळे आपण मोठा भाऊ आहोतहे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसने संपूर्ण दारूगोळय़ासहित लढाईच्या साधनांची तयारी करून ठेवली आहे.
 
निवडणुकांत एकमेकांना आव्हान देऊन विजय मिळवणे तेवढे सोपे राहिलेले नाही. त्यासाठी आघाडीच मजबूत ठेवावी लागेल. खरेतर राज्यातील विरोधी पक्ष निष्प्रभ झालेले असताना आणि विरोधकांचा कसलाही झंझावात येण्याची शक्यता नसताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसने अधिक राजकीय प्रगल्भता दाखवणे आवश्यक आहे. पण आघाडीमध्ये असलेल्या आक्रमक घटकांनीआघाडी तुटेल कशीयावर लक्ष ठेवून काँग्रेसबरोबर कुस्तीच्या डरकाळय़ा सुरू केल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीमध्ये मतभेद वाढू लागले आहेत. शिवसेनेच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी मनसे टपून बसली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या तंबूत जाऊन शिवसेनेला वाकुल्या दाखवल्या असल्याने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा तीळपापड झाला. त्यांच्यातील डब्ल्यू डब्ल्यू एफचा प्रयोग नुकताच पार पडला. त्याचबरोबर काँग्रेसने दलित मागासवर्गीयांसाठी राबवलेल्या कार्यक्रमामुळे काँग्रेसची व्होटबँक कायम राहण्याची शक्यता असल्याने रामदास आठवल्यांचे काय करायचे आणि शिवशक्ती-भीमशक्तीचे काय होणार?या विवंचनेने या नव्या मित्रांमध्ये देखील डब्ल्यू डब्ल्यू एफचा सामना रंगण्याची शक्यता आहे. या नामी संधीचा उपयोग करण्याऐवजी काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीने जणू काही डब्ल्यू डब्ल्यू एफचा आखाडा तयार करून महाराष्ट्रातील तमाम जनतेला तिकडेच आकर्षित करून घेतले आहे.
 
अजितदादांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवीलअसे जाहीर करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मुंबईठाणे महानगरपालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेस या महापालिका क्षेत्रात स्वत:ची ताकद कितपत दाखवू शकेलयाबाबत स्वत: पक्षाध्यक्ष पवार साशंक आहेत. त्यामुळेच या दोन महानगरपालिकांमध्ये काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या ठाणे शहरात काँग्रेससोबत आघाडी केल्यास आघाडीची सत्ता येऊ शकेलयाचा पुरेपूर अंदाज त्यांना आला आहे. गेल्या सप्ताहात ठाणे महापालिकेचा आढावा घेऊन तसेच कार्यकत्यार्ंशी चर्चा करून आघाडीची भूमिका त्यांनी घेतली. ठाण्यातील काँग्रेसच्या नेत्यांशीही त्यांनी चर्चा केली असूनआघाडी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास पुढाकार घेतला आहे. काकांच्या या भूमिकेने पुतण्याचे अवसान गळून गेले असले तरी जेथे राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. तेथेच आघाडी करावी याला अजितदादांनी दुजोरा दिला आहे. अजितदादा हे परखड स्वभावाचे असल्याने तसेच कावेबाजपणा त्यांच्या स्वभावात नसल्याने काकांच्या सर्वच निर्णयांशी ते सहमत होतीलअसे नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने तेथे स्वबळावर लढायचे आणि मुंबई-ठाणे महापालिकेत काँग्रेसच्या कुबडय़ा घेऊन लढायचे हे अजितदादांना मान्य दिसत नाही. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली असूनउपमुख्यमंत्रीपद तसेच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती आल्यानंतर पक्ष अधिक बलवान झाला असल्याचा भास त्यांना होऊ लागला आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसला आरपार करून टाकण्याचे मनसुबे त्यांनी रचले आहेत. पण काका हे पुतण्याच्या मागे फरफटत कसे जातीलआजवर काँग्रेसबरोबर हवी तेथे आघाडी करून हवे ते पदरात पाडून घेण्याची धूर्त खेळी त्यांनी खेळली. आघाडी करण्यासाठी काँग्रेसनेही अनुकूल वातावरण तयार करून दिले. टू-जी स्पेक्ट्रम घोटाळय़ासंदर्भात नेमलेल्या उच्चाधिकार समितीमध्ये पवारांचा समावेश केला असूनपवारांनीही या प्रकरणात तथ्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळेच अजितदादांनी स्वबळाची भाषा केल्याबरोबर शरद पवार मुंबई-ठाण्यात येऊन धडकले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काका-पुतण्यांची चाल ओळखून राज्यात काँग्रेसने आपली ताकद दाखवण्याची तयारी केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केवळ मुंबई-ठाण्यापुरता नव्हे तर महाराष्ट्राचा विचार करून आघाडीसंबंधी निर्णय घेतला जाईलअशी ठाम भूमिका घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर फरफटत जाणार नाहीअसा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दुर्बल असेल तिथे काँग्रेसला मोठा भाऊ म्हणायचे आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व जिथे असेल तिथे मोठय़ा भावाला बाजूला सारून डरकाळय़ा फोडायच्या हा दुटप्पीपणा चालवून घेणार नाहीअसा इशारा माणिकरावांनी दिला आहे.

मध्यमवर्गीयांच्या मतावर भिस्त ठेवून निवडून येणाऱ्या शिवसेना-भाजप-मनसेने या मतांसाठी आपसात खुशाल चढाओढ करावी. मात्र, काँग्रेसने आपली बाजू भरभक्कम राहावी, यासाठी पक्ष संघटना आणि सरकार या दोन्ही पातळय़ांवर कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसची दलित-मुस्लिम वोट एकसंध ठेवण्यासाठी काँग्रेसने 2011-12 हे ‘सामाजिक समता वर्ष’ जाहीर केले असून, दुर्बल समाज घटकांच्या विकासासाठी 105 योजनांची घोषणा  केली. त्यापैकी अनेक योजना सुरू केल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मागासवर्गीयांच्या विकासासाठी सनद जाहीर केली होती. काँग्रेसने मात्र आपले कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर जनसेवक नेमले असून, तीन महिन्यांपूर्वी नाशिक येथे जनसेवक शिबिरही भरवण्यात आले होते. जिल्हा-तालुका स्तरावरून जनसेवकांचे काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे अण्णा हजारे यांचे भाचे विनायकराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे जनसेवक काम करत असून, या कामाला अण्णांनी आशीर्वाद दिले आहेत. त्यामुळे आपले काही खरे नाही, अशी भीती शिवसेना-भाजप-मनसे आणि राष्ट्रवादी यांना वाटू लागली आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP