Tuesday, February 24, 2015

कुठे चालला आहे महाराष्ट्र आपला!

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांची प्राणज्योत अखेर मालवली़ उपेक्षीत, शोषीत पिडीतांचा आधारवड असलेला एक लढवय्या नेता महाराष्ट्राने गमावला़ गोरगरी
ब, दलित, आदिवासी, झोपडपट्टीवासीय, फेरीवाले, कामगार, गरीब शेतकरी, घरकामगार महिला अशा सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी सतत संघर्ष करीत राहणारा, सर्व पुरोगामी सामाजिक, राजकीय,  संघटनांमध्ये कार्यरत असणारा, तरुणांचे प्रेरणास्थान असणारा एक ज्येष्ठ नेता मृत्यू शय्येवरही पाच दिवस झूंज देत राहिला, अखेर संघर्ष थांबला़ मन सामर्थ्यशाली असले तरी मारेकºयांनी शरीरावर घाव घालून ते निकामी केले होते़ त्यात ते यशस्वी झालेही असतील पण लाखोंच्या मनात त्यांनी पेरलेला विचार मरणार नाही, एवढी सुध्दा बुध्दी त्या मारेकºयांना नाही़ या तोकड्या संकूचित विचारसरणीचा जो मेंदू असतो तो राग आला की, मारुन टाकायचे एवढाच विचार करु शकतो़ बुध्दीवादी लोक विचारांचा मुकाबला विचाराने करीत असतात़ पण एखाद्या बुरसटलेल्या संकूचित विचारांवर श्रध्दा ठेवण्यासाठी प्रशिक्षीत केलेल्या लोकांची मानसिकता तशीच बनून जाते़ बुध्दीप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, सर्वधर्म समभाव, लोकशाही या मूल्यांना मानण्याचा ते विचारच करू शकत नाहीत़ त्यातून समाज हादरवून टाकणारे, दहशत निर्माण करणारे कृत्य त्यांच्याकडून घडविले जाते. अशी कथित श्रध्दावान माणसे समाज हिताला बाधा आणणारे काम करीत असतात़ अशी माणसे आणि असे संकूचित धर्मांध मेंदू जगभर सर्वत्र पसरलेले आहेत, त्याला भारत देश आणि पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्रही अपवाद नाही़ असे लोक दूसरा कोणताही विचार अथवा अन्य कोणतीही व्यवस्था मान्य करणारे नसतात़
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉ़ आण्णा पानसरे यांच्या मृत्यूनंतर जी प्रतिक्रीया दिली, ती अत्यंत बोलकी आहे़ फडणवीस म्हणाले की, ‘‘पानसरेंवरील हल्ला हा व्यवस्थेवर घाला आहे़’’  ज्यांचा कोणाचा या लोकशाही राज्यव्यवस्थेवर अथवा राज्यातील शासन व्यवस्थेवर  विश्वास नाही, अशा प्रतिगामी विध्वंसक शक्तींनी पानसरेंवर हल्ला करुन त्यांना ठार केले आणि याच शक्तींनी अंधश्रध्दा निर्मुलनाचे पुरस्कर्ते डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांनाही मारुन टाकले़ सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या गंंभीर प्रकरणाला पुरोगामी अथवा प्रतिगामी असे वळण लावू नका, असे प्रसारमाध्यमांना सुनावले़ सरकार म्हणून त्यांचे वक्तव्य सोयीचे असू शकेल परंतू मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान अत्यंत गंभीर आहे़ मोठमोठ्या प्रभावी, ध्येयवेड्या पुरोगामी नेत्यांना ठार मारुन आपल्या व्यवस्थेलाच कोणी विध्वंसक शक्ती आव्हान देत असतील तर ते आव्हान मोडून काढण्याचेही फार मोठे आव्हान फडणविसांसमोर उभे आहे़ प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या व्यवस्थेला, शासकीय यंत्रणेला आव्हान देवून या राज्यात अशांतता आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीतरी अज्ञान शक्ती करीत आहे, असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्या शक्तींचा उभ्या महाराष्ट्राने निषेध केला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे़ मुख्यमंत्रीच स्वत: व्यवस्थेसमोर आव्हान उभे असल्याचे सांगत असतील तर शासकीय यंत्रणेने, पोलीस प्रशासनाने आणि तपास यंत्रणांनी कोणाच्या तोंडाकडे पाहायचे? अशा प्रकारचे विध्वंसक शक्तींचे आव्हान आणि दहशत काँग्रेस­राष्ट्रवादी आघाडी सरकारलाही असावे, शासकीय व्यवस्थेपेक्षा त्या शक्ती अधिक प्रबळ असाव्यात़ त्यामूळेच आघाडी सरकारला दाभोलकरांचे मारेकरी शोधता आले नाहीत़ त्या सरकारने मारेकरी पकडून देणाºयास दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते आणि पानसरेंचे मारेकरी पकडण्यासाठी भाजप सरकारनेही पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे़ पण पैशाच्या लोभानेदेखील मारेकरी पकडून दिले जात नाहीत़ एवढ्या विध्वंसक शक्ती माथेफिरू असाव्यात़ आघाडी सरकारमध्ये गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते, आऱआऱ पाटील हे गृहमंत्री होते़ आता साक्षात मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे पण ‘त्या’ शक्तींना मुख्यमंत्र्यांचीही भीती वाटत नाही़ त्यामूळे राष्ट्रवादी असो की भाजप त्यांना मारेकरी का शोधता येत नाहीत? राष्ट्रवादी आणि भाजप यांचा कार्यकारणभाव एकच आहे की काय? मारेकरी आजूबाजूला असूनही त्यांना पकडायचे नाही, मोकाट राहू द्यायचे आणि जे जे होईल ते ते पाहावे, असे धोरण आहे की काय? कदाचित हे कृत्य जहाल हिंदूत्ववादी संघटनांचे तर नाही? नसेल तर राज्यातील सर्व संघटना हत्येचा निषेध का करीत नाही? अशा नाना शंका कुशंका विचारल्या जात आहेत़ पुण्यामध्ये मोहसीन शेख या आय़टी़मधील तरुणाचा खून झाला़ त्याची जबाबदारी हिंदू राष्ट्रसेनेने घेतली होती़ परंतू पानसरे, दाभोलकर यांची हत्या करुन जबाबदारीदेखील न स्विकारणाºया संघटना अथवा व्यक्तींना भ्याड म्हणावे लागेल़ अशा भ्याड शक्तींनी सरकारसमोर जे आव्हान उभे केले आहे़ ते मोडून काढण्याचे मनोबल मुख्यमंत्र्यांना लाभले पाहिजे आणि त्याला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या यंत्रणांना अधिक सक्षम केले पाहिजे़ हे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्र्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही़
कॉ़ पानसरे हे फुले, शाहू, आंबेडकरी चळवळींचा चेहरा म्हणून ओळखले जात असत़ त्यांनी २२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाने शिवाजी महाराजांचे खरे कार्य जनतेसमोर आणले होते़ आतापर्यंत आपण शिवाजी महाराजांचा इतिहास जो शालेय पुस्तकांत वाचतो किंवा प्रस्थापित साहित्यीकांनी आपल्या कथा, कादंबºया, नाटके, पोवाडे, कविता या माध्यमांतून शिवाजींचे जे चरित्र मांडले त्यापेक्षा रयतेचा राजा हे उद्बोधक चरित्र त्यांनी आपल्या पुस्तकातून वेगळ्या पध्दतीने मांडले़ या पुस्तकाचे देशातील विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले़ लाखो प्रती या पुस्तकाच्या खपल्या़ पानसरेंनी शिवाजी महाराजांची बहूजन प्रतिपालक ही प्रतिमा निर्माण केली़ या पुस्तकाने शिवाजी महाराजांचे खरे चरित्र जनतेसमोर मांडले़ त्यांच्या एका लहानश्या पुस्तकाने एक प्रकारे क्रांतीच केली़
महात्मा गांधींची हत्या करणाºया नथूराम गोडसेंचे सुरु असलेले उदात्तीकरण, प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा घटनादत्त अधिकार असताना घरवापसीसारखा काही संघटनांनी सुरु केलेला उपक्रम, लव जिहादसारखा सक्तीचा उपक्रम, राष्ट्रासाठी हिंदूंनी चार अपत्ये जन्माला घालावी असा धर्ममार्तंडांचा आदेश तसेच भगवत्गितेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देण्याची मागणी या सर्व बाबी धर्मांध शक्तींना बळ मिळवून देणाºया असून केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर या शक्तींनी डोके वर काढले आहे़ या प्रकारांना पानसरेंनी तीव्र विरोध दर्शविला होता़ केंद्रात हिंदूत्ववादी सरकार आल्यामुळे धर्मांध शक्ती प्रबळ झाल्या असल्याचे मत ते जाहीरपणे व्यक्त करीत असत़ त्यामूळेच दुखावलेल्या संघटनांनी पानसरेंचा काटा काढला असावा, अशी शंका पुरोगामी संघटनांचे लोक व्यक्त करीत आहेत़ लोकांच्या मनात ज्या शंका कुशंकांचे वादळ उठले आहे, ते दूर करण्यासाठी लवकरात लवकर मारेकºयांना तसेच त्यामागे ज्यांचा मेंदू आहे, अशा लोकांना अटक करुन सत्य उघड करण्याचे मोठे आव्हान फडणवीस सरकारसमोर आहे़ हिंदू समाज विज्ञाननिष्ठ, सज्ञान व आधूनिक विचारांचा करावा, यासाठी प्रयत्न करणाºया दाभोलकरांचा विचारही धर्मवाद्यांना पटला नव्हता़ त्यामूळे अशा धर्मांधांनीच त्यांना मारले असावे, या शंकेने जोर धरला़ परंतू मारेकरी मिळाले नसल्यामुळे शंका निरसन होवू शकले नाही, याची सरकारने दखल घेण्याची गरज आहे परंतू काहीच घडत नाही त्यामूळे पुरोगामी नेत्यांची मोठी परंपरा असलेला आपला महाराष्ट्र चालला आहे तरी कुठे? असा प्रश्न पडतो़



जाता जाता़़़


विकृतीचे बळी

देश आधूनिक बनत चालला आहे़ विज्ञान­तंत्रज्ञानाने प्रगतीची झेप घेतली आहे़ परंतू तेवढ्याच मोठ्या प्रमाणात विकृतीही वाढत चालली असून महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची चिन्हे नाहीत़ पुणे जिल्ह्यात तर याचे प्रमाण अधिक वाढले असून मुलींवरील बलात्कार करुन खून करण्याचे प्रकार दररोज घडू लागले आहेत़ कोवळ्या बालिकेपासून वृध्द महिलांपर्यंत अशा घटना घडू लागल्या आहेत़ नराधमांना नात्या­गोत्यांची ओळख राहिलेली नाही़ आपल्या घरातल्या मुलींवर असा प्रसंग आला तर?  माणसांच्या संवेदना बोथट होवून गेल्या आहेत़ गेल्या सप्ताहात लोणावळा येथे एका सात वर्षांच्या मुलीवर नराधमांनी बलात्कार करुन तिचा गळा चिरुन खून केला़ माणूसकीला काळीमा फासणारे क्रौर्य आजूबाजूला घडत असताना पोलीस मात्र सुस्त असल्याचे दिसत आहे़ रोज मरे त्याला कोण रडे अशीच प्रवृत्ती दिसू लागली आहे़

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP