Sunday, May 3, 2009

अंदाज अपना अपना...


02 May, 2009

पुढचा पंधरवडाभर अंदाज बांधण्याशिवाय नेतेमंडळींपुढे दुसरा पर्याय नसल्याने प्रत्यके पक्ष आपापले भविष्य मांडून स्वत :चे समाधान करून घेत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यावर राजकीय पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली आहे. पंधरवडाभर केवळ अंदाज बांधण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नसल्याने प्रत्येक पक्ष आपापले भविष्य मांडून स्वत:चे समाधान करून घेत आहे.

राज्यातील ४८ पैकी ३२ ते ३४ जागा जिंकू, असा विश्वास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आहे. तर शिवसेना भाजप
युतीला २६ ते २८ जागा जिंकण्याची आशा आहे. तर, ‘युतीला ३३ जागा मिळतील. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भ मराठवाडयात्न साफ होईल, त्याचा आम्हाला अधिक फायदा मिळेल’ असे शिवसेना नेते रामदास कदम यांचे म्हणणे आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याशी चर्चा केली असता आठ जागांवर चुरशीची लढत होईल मात्र १८ जागा निश्चितपणे येतील, असेच त्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसने राज्यात २६ जागा लढवल्या; त्यापैकी १८ जागा नक्कीच मिळतील. यावेळी विदर्भातही आमच्या ३ ते ४ जागा येतील - मुख्यमंत्री अशोक चव्हाण

राष्ट्रवादीला १६ जागा मिळतील. यावेळी जिल्हापरिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती या ठिकाणी आमची
ताकद वाढली आहे त्याचा फायदा मिळेल- गोविंदराव आदिक, राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना भाजप युतीला २६ ते २८ जागा मिळतील. ही संख्या निकालानंतर वाढेल, पण कमी होणार नाही - गोपीनाथ मुंडे, भाजप

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP