Monday, July 4, 2011

रेव्ह सेनेचे प्रताप; स्वाभिमानचा चाप



रेव्ह पार्टी संदर्भात अटक करण्यात आलेला अपराजित मित्तल हा रायगड जिल्ह्याचा प्रमुख संघटक असल्याचे उघड झाल्याने युवासेनेचे ‘रेव्ह सेना’ असे नामकरण प्रसारमाध्यमांनी करून टाकले आहे. युवापिढीचे जे अवमूल्यन रेव्ह सेनेने सुरू केले आहे त्याचा तीव्र निषेध नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने केला असून, राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे.




रेव्ह पार्टी संदर्भात अटक करण्यात आलेला अपराजित मित्तल हा रायगड जिल्ह्याचा प्रमुख संघटक असल्याचे उघड झाल्याने युवासेनेचे 
‘रेव्ह सेना’ असे नामकरण प्रसारमाध्यमांनी करून टाकले आहे. युवापिढीचे जे अवमूल्यन रेव्ह सेनेने सुरू केले आहे त्याचा तीव्र निषेध नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने  केला असून, राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. युवासेनेचे हे रेव्ह प्रताप इतक्या स्पष्टपणे पुढे आल्यामुळे उद्धव ठाकरेंचा तीळपापड झाला नसता तरच नवल होते. त्यामुळे त्यांनी नितेश राणे यांच्यावर तोंडसुख घेतले. पण नितेश राणे त्यांना पुरून उरले आहेत. राज्यभरातील युवकांची मोठी फौज त्यांच्या मागे उभी आहे. त्यांनी रेव्ह सेनेला चांगलाच चाप दिला आहे. 


काळय़ा पैशाने मुजोर झालेली धनदांडग्यांची मुले-मुली अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडली असल्याचे वारंवार उघड? झाले आहे. मुंबई-पुण्यात मोठय़ा प्रमाणात पसरलेले हे लोण राज्याच्या इतर शहरांमध्ये पसरण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर येथे  ‘माऊंट व्ह्यू’ रिसॉर्टमध्ये अंमली पदार्थाचे सेवन करून धागडधिंगा घालणा-या 231 मुले व 59 मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची घटना घडली आहे. चरस, गांजा, कोकेन, एमडीएम असे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या 300 मुला-मुलींची रेव्ह पार्टी पोलिसांच्या पाठिंब्याने तर झालीच पण या पार्टीला राजकीय वरदहस्तही लाभल्याचे उघड झाले आहे. शिवसेना युवासेनेची साथ लाभलेली ही रेव्ह पार्टी असल्याचे उघड होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नाकाला अशा मिरच्या झोंबल्या की, त्यांनी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तोंडसुख घेतले. रेव्ह पार्टीचे आयोजक शिवसेना युवासेनेचा रायगड जिल्हा संघटक अपराजित मित्तल आणि त्याचा साथीदार विकी शहा असल्याचे समजताच स्वाभिमान संघटनेने मुंबई विद्यापीठात निदर्शने करून युवासेनेचे सिनेट सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली. यामुळे संतप्त झालेल्या उद्धव ठाकरेंचा तोल गेला. उद्धव ठाकरेंचा हा थयथयाट पाहून त्यांना नितेश राणे आपले प्रतिस्पर्धी वाटू लागले की काय,अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ?लागली आहे.
नितेश राणेंनी देखील ‘हम भी कुछ कम नही’ च्या जोषात उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. रेव्ह पार्टीने मनोबल खच्ची झालेल्या उद्धव ठाकरेंच्या शिववडापाव समोर नितेश राणेंनी छत्रपती वडापाव हा तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा करून राजकारणात चांगलेच रंग भरले आहेत. शिवसेनेला शिववडा पचणार नाही, अशी परिस्थिती त्यांनी करून ठेवली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेवरील पकड ढिली झाली आणि शिवसेनेची रेव्ह सेना कधी झाली, हे त्यांचे त्यांनाच कळले नसावे.? त्यांच्यात संघटना चालविण्याची धमक नसते त्यांच्या हातात एखाद्या राजकीय पक्षाची सूत्रे गेली की, त्याचे काय होऊ?शकते याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेच्या युवासेनेची रेव्ह सेना पाहण्याची वेळ बाळासाहेबांवर आली आहे. रेव्ह पार्टी संदर्भात अटक करण्यात आलेला अपराजित मित्तल हा रायगड जिल्ह्याचा प्रमुख संघटक असल्याचे उघड झाल्याने युवासेनेचे ‘रेव्ह सेना’ असे नामकरण प्रसारमाध्यमांनी करून टाकले आहे. नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने युवापिढीचे जे अवमूल्यन रेव्ह सेनेने सुरू केले आहे, त्याचा तीव्र निषेध केला असून, राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. युवासेनेचे हे रेव्ह प्रताप इतक्या स्पष्टपणे पुढे आल्यामुळे उद्धव ठाकरेंचा तीळपापड झाला नसता तरच नवल होते. त्यामुळे त्यांनी नितेश राणे यांच्यावर तोंडसुख घेतले. पण नितेश राणे त्यांना पुरून उरले आहेत. राज्यभरातील युवकांची मोठी फौज त्यांच्या मागे उभी आहे. त्यांनी रेव्ह सेनेला चांगलाच चाप दिला आहे.

उद्धव ठाकरेंकडे सत्तेची सूत्रे आल्यामुळे शिवसेनेची जरब आणि आदरयुक्त धाक आपोआपच कमी झाला. इतर सर्वच राजकीय पक्षांच्या युवा संघटना असताना शिवसेनेने विद्यार्थी सेना हिच युवासेना ठेवली होती. मात्र, आता बाळासाहेबांनी नातवासाठी नवी युवासेना काढली. कोणतेही राजकीय, सामाजिक, संस्कार नसलेल्या आणि अद्याप कोणताही अनुभव नसलेल्या आदित्य ठाकरे याने आपल्या संघटनेत धनदांडग्या कुणालाही स्थान देण्यास सुरुवात केली. तेच त्याचे साथीदार बनले. त्यापैकीच एक असलेला अपराजित मित्तल याला रेव्ह पार्टी प्रकरणात  अटक झाली. गोरेगाव येथे राहणाऱ्या शिवसेना नेत्याचा मुलगाही रेव्ह पार्टीत असल्याचे तसेच काही आमदार व लोकप्रतिनिधींची मुले या पार्टीत असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना मिळाली होती. मात्र, राजकीय दबावामुळे ती नावे पोलिसांच्या दफ्तरातून गायब झाली.

शिवसेनेची युवासेना रेव्ह पार्टीत गुंतल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वाभिमान संघटनेने सर्वप्रथम निषेध केला तर युवक काँग्रेसच्या काही तरुणांनी या गलिच्छ कृत्यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी शिवसेना भवनाजवळ? पथनाटय़ करण्याचे ठरविले होते. शिवसेना भवनाजवळ पथनाटय़ होणार, अशी कुणकुण लागताच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे भाडोत्री गुंड शिवसेना भवनाजवळ जमवले. दोन तरुण शिवाजीपार्कजवळ आले असता, त्यांना पोलिसांनी अडवले ते पाहताच त्या भाडोत्री गुंडांनी त्यांना लाठय़ा-काठय़ा आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.? मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत त्यांच्यापैकी कोणालाही अटक केली नाही.

सामाजिक भावनेतून पथनाटय़ करू पाहणा-या दोन तरुणांना दोनशे जणांनी मारहाण केल्याचा उद्धव ठाकरेंना एवढा अभिमान वाटला की, त्यांनी ‘हाच शिवसेनेचा खरा चेहरा’ असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. रेव्ह पार्टीत युवासेनेचे पदाधिकारी सापडल्याने पुरती अब्रू गेलेली असताना उद्धव ठाकरेंनी नितेश राणे यांचे नाव न घेता शिंतोडे उडविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना शिवसेना विभाग प्रमुख, माजी आमदार, नगरसेवक, युवासेनेचे कार्यकर्ते या सर्वानी मारहाण केल्याबद्दल त्यांचे तोंडभरून कौतुक केले. या सर्वाची नावे शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ने प्रसिद्ध केली असताना पोलिसांनी साधी चौकशी करण्याचे सौजन्य दाखवले नाही आणि गृहखात्याने आपल्या अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले नाहीत. राष्ट्रवादीकडे असलेल्या गृहखात्याने शिवसेनेबाबत बोटचेपीची भूमिका घेतली आहे. गृहखात्याची भूमिका अनेकदा दुटप्पी आणि पक्षपाती असल्याचे निदर्शनास आले आहे. निष्पाप तरुणांना मारहाण झाल्याचा पुरावा असताना त्यांच्या चौकशीचे अथवा अटकेचे आदेश नाहीत. जे. डे. सारख्या ज्येष्ठ पत्रकाराची हत्या का केली याचा तपास सीबीआयकडे द्यायचा नाही. मात्र, चिंटू शेखसारख्या चिटरने केलेल्या तक्रारीची ‘गंभीर’ दखल घेत ते प्रकरण लगेच सीबीआयकडे देण्याची तत्परता न्यायालयात दाखवायची, जे. डे. पेक्षा चिंटू शेख श्रेष्ठ अशी दुटप्पी, पक्षपाती भूमिका गृहविभाग घेत आहे.

नितेश राणे यांनी अशा दुष्प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करून आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. पाणी समस्या, नालेसफाई,रस्त्यांवरील खड्डे, बेरोजगारी, साथीचे रोग यांसारख्या अनेक नागरी समस्या स्वाभिमानने हाती घेतल्या असून, वॉटर टँकर माफिया तसेच पालिकेतील भ्रष्टाचार उघड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शिवसेनेने अनधिकृत जागेवर शिव वडापावच्या गाडय़ा टाकून सत्तेचा दुरुपयोग केला आहे. त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्त्युत्तर देण्यासाठी स्वाभिमान संघटनेने प्रतीकात्मक छत्रपती वडापाव सुरू केला. शिव वडापावला छत्रपती वडापावने जोरदार धडक दिल्यामुळे शिवसेनेची पुरती भंबेरी उडाली असून, पालिका प्रशासनासमोर मोठाच पेच उभा राहिला आहे. छत्रपती वडापाव बंद करायचा तर शिव वडापाववर देखील कारवाई करावी लागेल, अशा पेचात प्रशासन अडकले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना स्वाभिमानने वडापावच्या गाडय़ांकडून हप्ते वसूल करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची आणि  शिवसेना नगरसेवकांची चांगलीच पंचाईत करून टाकल्यामुळे स्वाभिमानला जनसामान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. तर कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. स्वाभिमानने शिवसेनेला दणका देऊन आपली ताकद दाखवून दिल्यामुळे राजकीय वर्तुळातही स्वाभिमानची चर्चा सुरू झाली आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP