अमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा
उद्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन महाराष्ट्रभर साजरा होत आहे़; परंतु या दिवसाचे औचित्य साधून एक मार्च पासूनच ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले आहे़ कार्यक्रमांमध्ये नेहमीप्रमाणे महिलांचे स्वातंत्र्य, महिलांचे सबलीकरण, महिलांची प्रगती, गगनभरारी यावर चर्चासत्रे झडू लागली आहेत़ पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये महिलांना दुय्यम स्थान देण्यात आले़ त्यांच्या प्रगतीचे रोखलेले रस्ते खुले व्हावे यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत़ भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे व त्यानुसार तयार झालेली न्यायव्यवस्था विविध कायदे यांना अधिन राहून मिळणारे हक्क स्त्रियांना हवे आहेत़ त्यासाठी समाजाने जागे होण्याची होण्याची सरकारने दक्ष राहण्याची आवश्यकता आहे़