Wednesday, March 9, 2016

अमानुष शिक्षेच्या जातपंचायती नष्ट करा

उद्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन महाराष्ट्रभर साजरा होत आहे़; परंतु या दिवसाचे औचित्य साधून एक मार्च पासूनच ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले आहे़ कार्यक्रमांमध्ये नेहमीप्रमाणे महिलांचे स्वातंत्र्य, महिलांचे सबलीकरण, महिलांची प्रगती, गगनभरारी यावर चर्चासत्रे झडू लागली आहेत़ पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमध्ये महिलांना दुय्यम स्थान देण्यात आले़ त्यांच्या प्रगतीचे रोखलेले रस्ते खुले व्हावे यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होत आहेत़ भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वे व त्यानुसार तयार झालेली न्यायव्यवस्था विविध कायदे यांना अधिन राहून मिळणारे हक्क स्त्रियांना हवे आहेत़ त्यासाठी समाजाने जागे होण्याची होण्याची सरकारने दक्ष राहण्याची आवश्यकता आहे़

हे ‘प्रभू’, महिला प्रवाशांचे प्रश्न कायमच!

रेल्वे सेवेचा ‘प्रभू’ मार्ग हा खाचखळगे, अडीअडचणी यावर उपाययोजना करत देशभर सुविधांचे जाळे विणण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाने उभे केले आहे़ कोणतीही भाडेवाढ नाही, नव्या रेल्वे मार्गांच्या पोकळ घोषणा नाहीत, अपूर्ण योजना पूर्ण करण्यावर भर, रेल्वे स्टेशनवर वाय­फाय सुविधा, प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षितता असा संयमित; पण रेल्वेचा पाया मजबूत करणारा अर्थसंकल्प रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मांडला असला तरी महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या अर्थसंकल्पाने कोणतीही नवी उपाययोजना केलेली नाही़ महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहता या अर्थसंकल्पाने महिलांचा अपेक्षाभंग केला आहे, असेच म्हणावे लागेल़

मेक इन मराठवाडा, प्लीऽऽज!

‘मेक इन इंडिया’ उत्सवाने पूर्ण मुंबई शहर उजळून निघाले असताना मुंबईबाहेर महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात दुष्काळाच्या झळांनी गावे होरपळून निघत असल्याचे विदारक चित्र दिसू लागले आहे़ मुंबई शहरात नळ उघडताच धो धो पाणी सुरू होते. कित्येकदा नळ उघडे राहिले तर सारे पाणी वाहून जाते;पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून कित्येक आठवडे गावात पाणीच येत नाही. पण शहरातील सर्व सोयीसुविधांनी युक्त वातानुकूलित खोल्यांमध्ये बसणाºयांना या परिस्थितीची जाणीव होऊ शकत नाही़ महाराष्ट्राची आर्थिक उन्नती करण्यासाठी जागतिक पातळीवर गुंतवणूक झाली पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे यजमानपद स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक राजधानीत नेत्रदीपक उत्सवाचा बार उडवून दिला़ गिरगाव चौपाटीवरील मनोरंजन कार्यक्रमाचा संपूर्ण मंच आगीत जळून खाक झाल्यामुळे असुरक्षिततेचा संदेश गेला असला तरी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि नियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पार पडले़

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP