Friday, March 30, 2012

दादांची फटकेबाजी


अर्थसंकल्पावर भाषण करताना टीकाटिपण्णी करणा-या विरोधकांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी चोख उत्तर दिले.

अर्थसंकल्पावर भाषण करताना टीकाटिपण्णी करणा-या विरोधकांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी चोख उत्तर दिलेदादा गुरुवारी एकदमच फॉर्मात होतेअर्थसंकल्पावरील चर्चेला दोन्ही सभागृहांत उत्तर देताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.विधानसभेतील उत्तराची सुरुवात करतानाच दादांनी विरोधी पक्षनेते खडसे यांची टोपी उडवलीते म्हणाले कीविरोधी पक्षनेते म्हणतात राज्यात चार कोटी ट्रॅक्टर आहेतअसे अर्थसंकल्पात म्हटले आहे.खडसेसाहेब स्वतनीट वाचत जादेवेंद्र तुमची फजिती व्हावी म्हणून चुकीचे ब्रिफिंग करतोट्रॅक्टरची संख्या चार कोटी नाहीतर चार लाख आहेअसे दादांनी म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

राज्यात वाढलेल्या कर्करोगाचे भयानक स्वरूप लक्षात घेऊन तंबाखूजन्य पदार्थ खाणा-या सदस्यांची त्यांनी चांगलीच फिरकी घेतली.विधान परिषदेत तर त्यांची प्रतिभा फारच फुलली होतीजैतापूर प्रकल्पाला विरोध करणा-या रामदास कदम यांची खिल्ली उडवताना दादा म्हणालेरामदास कदम हे गॅलरीमध्ये भेटले की म्हणतातआम्हालाही हा प्रकल्प हवा आहेत्यावर रामदास कदम अहोअसं मी बोललोच नाहीअसा खुलासा करू लागलेत्यावर दादा म्हणालेमला तुमची अडचण माहिती आहे होतुम्ही इथे कबूल केले तर,मातोश्रीवरून फोन येईलयाची मला कल्पना आहेअर्थ विभागाच्या संकेतस्थळावर अद्याप सुनील तटकरे यांचाच फोटो असल्याचा मुद्दा बुधवारी विनोद तावडे यांनी मांडला होतात्यावर मिष्किल प्रतिक्रिया व्यक्त करताना दादांनी शेकापचे जयंत पाटील यांची फिरकी घेतली.ते म्हणाले मी माझा फोटो तेथे टाकणार होतोमात्र जयंत पाटीलच म्हणालेअजित तू माझं सगळं ऐकतो मगत्या वेबसाइटवर सुनीलचा फोटो राहू देत्यामुळे मीच आमच्या अधिका-यांना सांगितलं कीतटकरे यांचं खातं गेलं आहेनिदान फोटो तरी संकेतस्थळावर राहू द्यात्याचवेळी समोरच्या बाकांवरून विचारणा झाली कीकोणत्या जयंत पाटलांनी सांगितलेत्यावर अजितदादा म्हणालेहे आमचे शेकापचे जयंत पाटीलआमच्या जयंत पाटलांचा फोटो आबांना आवडतोजयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील संघर्षाची त्याला पार्श्वभूमी असल्याने सभागृहात पुन्हा हास्यकल्लोळ झाला.

नेहमी थेट बोलणा-या दादांची काव्यप्रतिभाही फुलली होतीत्यांनी सांगितले की विरोधक म्हणतातसांगा कसंजगायचंकण्हत कण्हत जगायचं की गाण गातं जगायचंमी म्हणतोते ज्याचं त्याने ठरवायलं पाहिजेमी तुम्हाला सांगतोतुम्हीच ठरवाशाप देत बसायचं की दुवा देत हसायचं..

दादांच्या या काव्यपंक्तीवर सत्ताधा-यांसह विरोधी बाकांवरील सदस्यांनीही बाके वाजवून प्रतिसाद दिला.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP