छत्रपतींचा रथ, राजकारणाचे घोडे!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवरायांचा अपमान कोण सहन करणार? कोणी शब्दांनी अथवा कृतीने असे करील, त्याचे हात-पाय कलम करण्याची भावनाच प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात असेल याबद्दल शंका नाही, याचे प्रत्यंतर आज पहिल्या दिवशी विधिमंडळात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवरायांचा अपमान कोण सहन करणार? कोणी शब्दांनी अथवा कृतीने असे करील,त्याचे हात-पाय कलम करण्याची भावनाच प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात असेल याबद्दल शंका नाही, याचे प्रत्यंतर आज पहिल्या दिवशी विधिमंडळात आले. जेम्स लेन नावाच्या विदेशी लेखकाने शिवरायांबरोबरच राजमाता जिजाऊंबद्दल अवमानकारक लिखाण केल्यावरून महाराष्ट्रात यापूर्वीच गदारोळ उडाला होता. जेम्स लेनला माहिती पुरवणाऱ्या पुण्याच्या भांडारकर संशोधन संस्थेवर हल्ले, मोर्चे, आंदोलने, कोर्टकचे-या सगळे होऊन गेले. सर्वोच्च न्यायालयाची दारेही ठोठावण्यात आली. या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने 2003मध्ये घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आणि जखमेवरची खपली निघाली. महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. लोकभावनेची तीव्रता लक्षात घेता, राजकारणी कसे मागे राहतील? प्रत्येक पक्षाने आपल्या राजकारणाचे घोडे पुढे दामटले. जणू काही छत्रपती शिवरायांचा रथ, पण घोडे राजकारणाचे! असा प्रकार विधानसभेत दिसला.
समाजवादी पक्षाच्या अबू आझमींपासून थेट गृहमंत्री आर. आर. आबा पाटलापर्यंत शिवरायांविषयीची लोकभावना कॅश करण्याचा प्रयत्न सुरू झाला. छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करणा-यांना ‘चुल्लूभर पाणी मे डुब कर आत्महत्या करनी चाहिए’ असे जोशपूर्ण वक्तव्य अबू आझमी यांनी केलेच. पण हे करताना ते राजकारण विसरले नाहीत. मोहंमद पैगंबरांविरुद्ध लिखाण करून मुस्लिमांच्या भावना दुखवणारे सलमान रश्दी आणि तस्लिमा नसरीन यांनी मुस्लिमांच्या भावना दुखावल्या. ते महाराष्ट्रात आल्यावर पोलिस संरक्षणात फिरतात. त्यांना बंदी नाही. छत्रपतींना एक न्याय आणि मोहंमद पैगंबरांना दुसरा, हे कसे चालेल? असा सवाल आझमींनी केला. आझमींनी मुस्लिमांचे राजकारण पुढे केले. मग हिंदुत्ववादी मागे कसे राहणार? भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी धर्माची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात करा, अशी मागणी केली. त्याचबरोबर अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आणि संसदेच्या आवारात छत्रपतींचा पुतळा उभा केला, याचे दाखले देत आपणही शिवरायांचे कैवारी असल्याचे दाखवले, तर सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर देऊन आम्हालाच छत्रपतींचा किती अभिमान हे दाखवून दिले.
राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे विधान परिषदेत ‘शिवाजी महाराजांबद्दल आमच्याही भावना तीव्र आहेत. पण राष्ट्रपुरुषाच्या नावाने आम्ही धंदा केला नाही’ असा खणखणीत युक्तिवाद केला. या प्रश्नी चर्चेची तयारी दाखवून विरोधकांना निरुत्तर केले. विधानसभेत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी वाजपेयी पंतप्रधान असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पुस्तकावरील बंदीला विरोध केल्याचे सांगताच विरोधक संतापले. अखेर शब्द मागे घेण्याच्या अटीवर वातावरण शमले, असे राजकारण घडले.
राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे विधान परिषदेत ‘शिवाजी महाराजांबद्दल आमच्याही भावना तीव्र आहेत. पण राष्ट्रपुरुषाच्या नावाने आम्ही धंदा केला नाही’ असा खणखणीत युक्तिवाद केला. या प्रश्नी चर्चेची तयारी दाखवून विरोधकांना निरुत्तर केले. विधानसभेत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी वाजपेयी पंतप्रधान असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पुस्तकावरील बंदीला विरोध केल्याचे सांगताच विरोधक संतापले. अखेर शब्द मागे घेण्याच्या अटीवर वातावरण शमले, असे राजकारण घडले.
0 comments:
Post a Comment