एकीचे बळ!
एकीचे बळ काय असू शकते, याचा अनुभव मंगळवारी महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितपणे मिळाला असेल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची अनंतकाळ चाललेली पिळवणूक आणि सीमावासीयांची छळवणूक थांबवून या प्रश्नांची त्वरित सोडवणूक व्हावी यासाठी महाराष्ट्राने कंबर कसली आहे.
एकीचे बळ काय असू शकते, याचा अनुभव मंगळवारी महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितपणे मिळाला असेल. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची अनंतकाळ चाललेली पिळवणूक आणि सीमावासीयांची छळवणूक थांबवून या प्रश्नांची त्वरित सोडवणूक व्हावी यासाठी महाराष्ट्राने कंबर कसली आहे. याचे पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. विधानसभेत अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी चर्चेच्या सुरुवातीलाच या प्रश्नाचे गांभीर्य राखण्याचे आवाहन सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या सदस्यांना केले. त्यामुळे काही तुरळक अपवाद वगळता विधानसभेने चर्चेला एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवण्यात यश मिळवले. सीमावासीयांना दिलासा मिळावा, त्यांच्यामागे महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांना द्यावा, महाराष्ट्राने सीमेवरील बांधवांना वा-यावर सोडलेले नाही याची जाणीव त्यांना व्हावी यासाठी चर्चेचे गांभीर्य राहिले पाहिजे. सीमावासीयांना न्याय देण्याची तळमळ चर्चेत प्रत्येकाच्या भाषणात दिसली पाहिजे, असे एका प्रकारे निर्देशच वळसे-पाटील यांनी दिले होते.
सभागृहाने केलेला एकमुखी ठराव पंतप्रधानांना देण्याची सूचनाही त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केली. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचे राजकीय भांडवल करून सभागृहात गोंधळ, गदारोळ करणा-या सदस्यांना आपोआप अटकाव झाला. अन्यथा सत्ताधारी आणि विरोधकांनी समोरासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केलीच होती. वातावरण बिघडवणाऱ्यांची सभागृहात कमी नाही, पण त्यांना वठणीवर आणण्याचे काम वळसे-पाटील यांनी केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी या प्रश्नी दिलेल्या अल्पकालीन चर्चेला ठरावात रुपांतरीत करण्याची मौलिक सूचना केली आणि चर्चेचे गांभीर्य वाढवले.
सभागृहाने केलेला एकमुखी ठराव पंतप्रधानांना देण्याची सूचनाही त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केली. त्यामुळे कोणत्याही प्रश्नाचे राजकीय भांडवल करून सभागृहात गोंधळ, गदारोळ करणा-या सदस्यांना आपोआप अटकाव झाला. अन्यथा सत्ताधारी आणि विरोधकांनी समोरासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केलीच होती. वातावरण बिघडवणाऱ्यांची सभागृहात कमी नाही, पण त्यांना वठणीवर आणण्याचे काम वळसे-पाटील यांनी केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी या प्रश्नी दिलेल्या अल्पकालीन चर्चेला ठरावात रुपांतरीत करण्याची मौलिक सूचना केली आणि चर्चेचे गांभीर्य वाढवले.
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत असताना त्यांनी वेशांतर करून बेळगावात आंदोलन केले होते. लाठय़ा खाल्ल्या होत्या, तेव्हा पोलिसाला मारल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. भुजबळ बोलण्यास उभे राहिले, तेव्हा त्यांनी या जुन्या आठवणींना उजाळा देण्यास सुरुवात केली आणि समोरच्या बाकावरील शिवसेना-मनसेचे आमदारही भावूक झाले. सीमाप्रश्नासाठी आंदोलन करणारे आक्रमक आमदार अशी ख्याती असलेल्या भुजबळांच्या भाषणाची सर्वाना उत्सुकता होती.
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे भाषण अत्यंत संयमित आणि सीमावासीयांचे दु:ख जाणून घेणारे होते. कर्नाटकात त्यांच्या पक्षाचे भाजपचे सरकार असूनही त्यांनी सीमावासियांची बाजू लावून धरली हे कौतुकास्पद होते. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आपल्या भाषणात त्यांचे आभार व्यक्त केले असते तर अधिक चांगले वाटले असते.
यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे, केंद्राने या प्रश्नी केलेल्या प्रतिज्ञापत्राला विरोध करण्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह सर्वानी घेतली असून एकीचे दर्शन घडवले, त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
0 comments:
Post a Comment