Thursday, August 4, 2011

कोळसा उगाळावा तितका..


कोळसा उगाळावा तितका काळा या उक्तीप्रमाणे भ्रष्टाचाराची चर्चा करावी तितकी थोडी, याचा प्रत्यय बुधवारी सभागृहात आला.

कोळसा उगाळावा तितका काळा या उक्तीप्रमाणे भ्रष्टाचाराची चर्चा करावी तितकी थोडीयाचा प्रत्यय बुधवारी सभागृहात आला. भ्रष्टाचाराचा कोळसा उगाळावा तेवढा थोडा असे म्हणत असताना कोळसा व्यापा-यानेही भ्रष्टाचारामध्ये भर घातली असल्याची चर्चा विधानसभेत झाली. एक कोळशाचा व्यापारी इनोव्हा गाडीतून दीड कोटी रुपये घेऊन मंत्रालयात निघाला होता. तो कोणाकडे गेलाअसा खळबळजनक सवाल विरोधकांनी केला. मनसेचे राम कदम यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी चांगलाच लावून धरला. प्रभाग रचना विधेयकावर चर्चा होताना निवडणुकीत कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याची कबुली आमदारांनीच नव्हे तर मंत्र्यांनीही दिली. सरकारचा एकही विभाग भ्रष्टाचारापासून मुक्त नसल्याचे सभागृहातील चर्चामधून वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.
 
निवडणुका लढवणे आजकाल सोपे राहिलेले नाहीहे तुम्हा-आम्हा सर्वानाच माहिती आहेअसे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले असताकेवळ स्मितहास्य करण्यापलीकडे सदस्यांची प्रतिक्रिया नव्हती. ही एक प्रकारची मूक कबुलीच होती. आपण सर्वजण कशापद्धतीने निवडून येतोकिती खर्च करतो हे आपणा सर्वाना माहितीच आहे,असे सांगून त्यांनी निवडणुकीतील भ्रष्टाचाराचीच जणू कबुली दिली. छोटे मतदारसंघ असले कीमतदारांना पैसे देऊन मॅनेज करण्याचे प्रकार होतात. मात्र मतदारांची संख्या वाढली तर भ्रष्टाचाराला आळा बसेल म्हणूनच तर सरकारने प्रभाग समितीची पुनर्रचना करून बहुसदस्यीय प्रभाग रचना केली असूनत्यासंबंधीचे विधेयक आणले आहे.
 
नागपूर येथील कोळसा व्यापा-याला दीड कोटी रुपयांसह मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इतके पैसे घेऊन हा व्यापारी कुठे चालला होतायावर बरेच चर्वित-चर्वण झाले. मनसेचे राम कदम यांनी तसेच भाजपचे नाना पटोले यांनी हा व्यापारी मंत्रालयात पाचव्या मजल्यावर हे पैसे घेऊन चालला होता. त्यामुळे पाचव्या मजल्यावर कोणते मंत्री आहेत आणि त्यापैकी कोणाचा संबंध कोळशाशी आहेयाची खमंग चर्चा चांगलीच रंगली होती. विरोधी पक्षनेते खडसे यांनी हे पैसे कोणासाठी चालले होतेत्या मंत्र्याचे नाव कळलेच पाहिजेअन्यथा सभागृह चालू देणार नाहीअसा पवित्रा घेतला. भ्रष्टाचाराची ही चर्चा जोरात होत असताना आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या व्यतिरिक्त एकही मंत्री सभागृहात उपस्थित नव्हता. त्यामुळे यासंबंधी गुरुवारी गृहमंत्री आर. आर. पाटील निवेदन करतीलअसे आश्वासन शेट्टींना द्यावे लागले.

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक झाले पाहिजे ही मागणी जोर धरू लागली असून,या जमिनीचा भाग पंचतारांकित हॉटेलला दिला जाणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मागासवर्गीय जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असून, या जमिनीतील एकही इंच जागा पंचतारांकित हॉटेल गेली तरी कोटय़वधी दलित जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राम पंडागळे यांनी विधान परिषदेत दिला. मुंबईतील भूखंड हडप करून कोटय़वधी रुपयांचे घोटाळे होत असल्याचे आता सर्वपरिचित झाले आहे. त्यामुळे इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकाला न मिळता बिल्डरच्या घशात जाईल की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाल्याचे सर्वानी मान्य केले असल्याने भूखंडप्रकरणी विविध घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांवर लोकांचा विश्वास बसू लागला आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP