जंगली महाराज, गाडगे महाराज
ग्राम स्वच्छता अभियान चालवून आधुनिक गाडगे महाराज ही उपाधी मिळवलेले तत्कालीन ग्रामविकास मंत्री व विद्यमान गृहमंत्री आर. आर. पाटील हे सांगली जिल्ह्यातील असल्याने त्याच जिल्ह्यातील राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम हे ‘जंगली महाराज’ असणार हे उघड आहे. सभागृहात विरोधी सदस्यांनी पतंगरावांना जंगली महाराज ही उपाधी देऊन धमाल उडवून दिली.
संत जंगली महाराज आणि संत गाडगे महाराज हे फार मोठे संत होऊन गेले. महाराष्ट्राच्या राजकारणातही ‘जंगली महाराज आणि गाडगे महाराज’ अवतरले आहेत. हे दोन्ही महाराज एकाच जिल्ह्यातले, एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आणि जिल्हा राजकारणात एकमेकांविरुद्ध सतत कट-कारस्थान करणारे म्हणून सर्वपरिचित आहेत. शुक्रवारी मात्र या दोघांनी एकमेकांचे बंधू असल्याचा आव आणत एकमेकांना चांगलेच टोले-प्रतिटोले हाणले. संत गाडगे महाराज कोण हे समजलेच असेल! ग्राम स्वच्छता अभियान चालवून आधुनिक गाडगे महाराज ही उपाधी मिळवलेले तत्कालीन ग्रामविकास मंत्री व विद्यमान गृहमंत्री आर. आर. पाटील हे सांगली जिल्ह्यातील असल्याने त्याच जिल्ह्यातील राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम हे ‘जंगली महाराज’ असणार हे उघड आहे. सभागृहात विरोधी सदस्यांनी पतंगरावांना जंगली महाराज ही उपाधी देऊन धमाल उडवून दिली.
त्याचे असे झाले की, भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी झाडे तोडण्यास बंदी घालण्याबाबतचे अशासकीय विधेयक मांडले होते. त्यावर बोलताना भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी पतंगरावांना उद्देशून म्हटले की, आर. आर. आबा पाटील हे ग्रामस्वच्छता अभियान राबवून गाडगे महाराज झाले. तसे तुम्ही झाडे वाचवली तर तुम्हाला जंगली महाराज म्हणतील.. असे त्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. पतंगरावांना जंगली महाराज म्हणण्यात आल्यानंतर मग सदस्यांमध्ये कोटय़ा करण्याची चढाओढ लागली. बापट म्हणाले, वनमंत्री म्हणजे जंगलचे राजे. आपण राजासारखा निर्णय घ्या आणि झाडे तोडण्यास बंदी घाला.
सदस्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा ऐकून पतंगराव उत्तर देण्यास उभे राहिले. म्हणाले, वृक्ष तोडण्यास कोकणात बंदी लावली तर लोक म्हणाले, माणसे जाळायला झाडे नाहीत. तेव्हा या लोकांना सांगितले की, झाडे तोडायला बंदी नाही. जी कत्तल चालली आहे, त्याला बंदी आहे. पण सरकारचीही एक समस्या आहे. पंधरा ते वीस किमी अंतरावर एक वनरक्षक असतो. तो झाडांचे रक्षण करणारे कसे? मग आम्ही महसूल विभाग आणि पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले, असे सांगून पतंगराव आबांवर चांगलेच घसरले. ते म्हणाले, आबांची एक खासियत आहे, आबांचे पोलिस त्यांचे एक दिवस ऐकतात आणि दुस-या दिवशी विसरून जातात. आता ते माझ्या जिल्ह्यातील, माझे छोटे बंधू असल्यामुळे जास्त काही बोलणार नाही, असा टोला पतंगरावांनी मारताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यावर आबा पाटील गप्प बसणार कसे? ते उठले आणि गेली दहा वर्षे ते मला छोटे बंधू म्हणतात पण वाटणी काहीच देत नाहीत, असा प्रतिटोला त्यांनी मारला.
0 comments:
Post a Comment