Friday, August 5, 2011

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी


स्त्री-भ्रूण हत्या या विषयावरील चर्चा हे गुरुवारचे वैशिष्टय़ होते. सुमारे पाच तास चर्चा झाली. पुरोगामी महाराष्ट्रात मुलींची संख्या कमी होत असून, तिची गर्भातच हत्या केली जाते, याबाबत सर्वच सदस्यांनी चिंता व्यक्त केली.

स्त्री-भ्रूण हत्या या विषयावरील चर्चा हे गुरुवारचे वैशिष्टय़ होते. सुमारे पाच तास चर्चा झाली. पुरोगामी महाराष्ट्रात मुलींची संख्या कमी होत असूनतिची गर्भातच हत्या केली जाते,याबाबत सर्वच सदस्यांनी चिंता व्यक्त केली. राज्याच्या महिला व बाल कल्याणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही चर्चा सामाजिक झाली असूनतिला राजकीय रंग न आल्याबद्दल सर्व सदस्यांना धन्यवाद दिले. विज्ञानाचा उपयोग अज्ञानासाठी होता कामा नये,अशा शब्दात सोनोग्राफी यंत्राच्या दुरूपयोगाबद्दल त्यांनी टिपणी केली. तरआरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी स्त्री-भ्रूण हत्या हा सामाजिक गुन्हा असूनसंपूर्ण ताकदीनिशी त्याचा सामना करण्याची ग्वाही दिली. या विषयावर महिला सदस्यांनी अत्यंत तळमळीने भाषणे केली. विशेष म्हणजे या विषयावर वेळेचे बंधन नसल्यामुळे सदस्यांना सविस्तर बोलता आले.

भाजपच्या पंकजा मुंडे-पालवे यांनी चर्चेची सुरुवात करताना स्त्री-भ्रूण हत्या आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व समस्यांचा ऊहापोह केला.
 
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
 
हृदयी पान्हा डोळय़ात पाणी
 
अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आणि संपूर्ण सभागृहाने बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले. सभागृहातील ज्येष्ठ महिला सदस्य शेकापच्या मीनाक्षीताई पाटील यांच्या अभ्यासपूर्ण आणि सखोल चिंतनातून केलेल्या भाषणालाही सभागृहाने उत्स्फूर्तपणे दाद दिली. मुलींची जन्माला येण्याआधीच हत्या कशाला करता असा प्रश्न करून पंडित नेहरूकेंद्रीय कृषिमंत्री शरद पवारविधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांना एकच मुलगी आहे तरअमेरिकेसारख्या जगाच्या महासत्तेचे प्रमुख असलेल्या जॉर्ज बुशबिल क्लिंटनबराक ओबामा यांना दोन मुली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
स्त्री-भ्रूण हत्या म्हणजेवात्सल्याची हत्याप्रगतीची हत्यास्त्री-भ्रूण हत्या म्हणजेरणरागिणीची हत्यारणचंडिकेची हत्या. ज्याच्यावर श्रद्धा आहे अशा परमेश्वराची हत्याअशा शब्दांत  सुरुवात करून त्यांनी सुंदर कविताही म्हटली.
 
लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते,
 
नवरात्रीच्या पावलांनी दुर्गा पावते,
 
वटपोर्णिमेच्या दिवशी सावित्री दिसते,
 
राखीचा धागा तर ताईच बांधते
 
पाडव्याचे औक्षण तर पत्नीच करते
 
तरीही गर्भातली चिमुकली गर्भातच मरते..
 
पुरोगामी महाराष्ट्रात महिलांची महती सांगितली जाते. मग मुलगी का नकोहा त्यांचा प्रश्न अंतर्मुख करणारा होता.

भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी मुलींची संख्या कमी झाली तर महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती उद्भवेल आणि द्विभार्याप्रमाणेबहुपती करण्याचा प्रसंग उद्भवेल की काय, असा मिश्किल प्रश्न विचारला तर शिवसेनेच्या मिराताई रेंगे-पाटील यांनी महाभारतातील कंस जन्मल्यानंतर मुलांना मारत होता. आता आधुनिक कंस जन्माला येण्यापूर्वीच मुलींना मारून टाकत आहेत, असे उदाहरण देऊन या प्रकाराची तीव्रता व्यक्त केली. पुरूष सदस्यांनीही या विषयावर गांभीर्याने चर्चा केली. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी आई, बहिण, पत्नी आणि प्रेयसी चालते मग मुलगी का चालत नाही, असा सुरुवातीलाच प्रश्न विचारून विधिमंडळाने हा प्रश्न आव्हान म्हणून स्वीकारावा आणि त्यावर विचार करावा, असे आवाहन केले. सर्वच सदस्यांनी पुरूषप्रधान मानसिकतेतून बाहेर येण्याचे आणि त्यासाठी सरकारसह सर्वानी गांभीर्याने प्रयत्न करण्याचा निर्धार करून चर्चा वेगळय़ाच उंचीवर नेली.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP