खेर यांची खैर नाही
अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला समर्थन द्यायला निघालेले अभिनेते अनुपम खेर शनिवारी सभागृहात सर्वाच्या टीकेचा विषय बनले. राज्यघटनेबद्दल त्यांनी जी मुक्ताफळे उधळली,त्यांचा सर्वपक्षीय आमदारांनी तीव्र शब्दांत निषेध केला आणि खेर यांना अद्दल घडवलीच पाहिजे, असा पवित्रा विधानसभाध्यक्षांसह सर्वानीच घेतला.

‘‘आपण गॅस बदलतो, चड्डी बदलतो तशी राज्यघटना बदलायला हवी. महाराष्ट्र विधिमंडळाने जे करायचे ते करावे, मी आपल्या विधानावर ठाम आहे,’’ असे वक्तव्य खेर यांनी दूरचित्रवाहिन्यांशी बोलताना केले. आव्हाड यांनी हा मुद्दा शनिवारी पुन्हा उपस्थित केला. सर्वपक्षीय आमदारांनी खेर यांचा निषेध नोंदवून भावना व्यक्त केल्याने विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांच्यावरील हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेतला. आता विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीपुढे हजर व्हावे लागणार असल्याने खेर यांची आता खैर नाही, अशीच प्रतिक्रिया उमटली आहे.
0 comments:
Post a Comment