खडसे असे कसे
जैतापूरात प्रक्षुब्ध जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात दुर्दैवाने एका आंदोलकाचा बळी गेला. हा प्रकार घडल्याची बातमी विधानभवनात पोहोचली आणि अर्थातच त्याचे तीव्र पडसाद उमटणार असे वाटू लागले. पण विधानसभेत विरोधी पक्षनेतेच नव्हते.
सोमवारी सभागृहात भलतेच घडले. या राज्याला विरोधी पक्षनेता आहे की नाही असे वाटले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात प्रकल्प विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तो हाणून पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली. प्रक्षुब्ध जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात दुर्दैवाने एका आंदोलकाचा बळी गेला. प्रकल्पाला समर्थन असो की विरोध, एका माणसाच्या पोलिस गोळीबारात मृत्यूचे समर्थन होऊच शकणार नाही. जैतापूरात हा प्रकार घडल्याची बातमी विधानभवनात पोहोचली आणि अर्थातच त्याचे तीव्र पडसाद उमटणार असे वाटू लागले. पण विधानसभेत विरोधी पक्षनेतेच नव्हते. सरकारला जाब विचारण्याऐवजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे बाहेर जाऊन आरामात बसल्याची चर्चा सर्वजण करत होते.
खडसे सभागृहाबाहेर आणि ज्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन होते त्या शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांचे बोलणे ऐकून पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार नव्हे पुष्पवर्षाव केला की काय, असे वाटावे इतके त्यांचे बोलणे पचपचीत आणि सपक होते. आंदोलकाचे मरणे दुर्दैवी आणि मरणानंतरचे सभागृहातील सोपस्कारही दुर्दैवी. देसाईंच्या भाषणानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी निवेदन केले आणि देसाई शांत बसले. एवढेच नव्हे तर कामकाज पुढे चालू झाले.
0 comments:
Post a Comment