Saturday, March 26, 2011

धुसफूस


विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी सदस्यांची बाके रिकामी होती. सत्ताधारी आणि विरोधी ही दोन्ही लोकशाहीची अविभाज्य अंगे आहेत. पण, शुक्रवारी सभागृहात निराळेच चित्र दिसले. विरोधी सदस्य सभागृहाबाहेर विधानभवनाच्या पाय-यांवर गळ्यात काळ्या फिती घालून बसले होते.

ठरल्याप्रमाणे विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकलाच. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी सदस्यांची बाके रिकामी होती. सत्ताधारी आणि विरोधी ही दोन्ही लोकशाहीची अविभाज्य अंगे आहेत. पणशुक्रवारी सभागृहात निराळेच चित्र दिसले. विरोधी सदस्य सभागृहाबाहेर विधानभवनाच्या पाय-यांवर गळ्यात काळ्या फिती घालून बसले होते. सत्ताधारी सदस्य बाहेर आले की त्यांच्या घोषणांचा जोर वाढत होता. अनेकदा बेताल वक्तव्य आणि भडक घोषणा दिल्या जात होत्या. मात्र सत्ताधारी व विरोधी दोन्ही बाजूंच्या नेत्यांना आणि ज्येष्ठ सदस्यांना झाला प्रकार पसंत नसल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवत होते. या प्रकरणी त्वरेने मार्ग काढावा आणि लोकशाहीची व पर्यायाने सभागृहाची प्रतिष्ठा राखावीअसा प्रयत्न सुरू झाला आहे.

अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांचे अर्थसंकल्प वाचन सुरू असताना गोंधळ घालणा-या विरोधी सदस्यांपैकी शिवसेना-भाजपाच्या नऊ सदस्यांचे निलंबन केले असल्यामुळे त्यांनी हा बहिष्कार टाकला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच विरोधकांनी अर्थसंकल्पाचे वाचन पूर्ण होईपर्यंत प्रचंड गदारोळ केला आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर राज्याचा अर्थसंकल्प जाऊच नयेअसा प्रयत्न केला. विरोधक एवढ्या टोकाच्या भूमिकेस गेलेच कसेया मागे कोणाचा हात आहेत्यांना कोणाची फूस आहे याची चर्चा आता विधानभवन परिसरात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातंर्गत बरीच धुसफूस असून,अजितदादांच्या कार्यपद्धतीबाबत अनेकांची नाराजी आहे. नेत्यांमधील धुसफूसच विरोधकांच्या गदारोळाला कारणीभूत ठरली असूनत्यातूनच विरोधकांना फूस दिली गेली असावीअशी चर्चाही रंगू लागली आहे.

राष्ट्रवादीच्या दादांविरोधी ज्या मंत्र्यांचे विरोधी पक्षामध्ये चांगले संबंध आहेत त्यांनी दादांना धडा शिकविण्यासाठी फूस लावली. फूस लावणारे नेमके कोण याचा शोध घेण्याची गरज नसूनते कोण हे सर्वानाच माहिती आहेअशीही चर्चा आहे. पण आपसातील हेवेदाव्याचे हिशोब चुकते करण्यासाठी सभागृहालाच वेठीस धरले जात असल्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे.


विरोधी सदस्य बहिष्कार टाकून सभागृहाबाहेर बसले असले तरी शेकापचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख सभागृहात आले आणि त्यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांच्या बहिष्काराबाबत तोडगा काढायला हवालोकशाहीमध्ये सर्वानाच कामकाजात भाग घेण्याचा हक्क आहेअसे मत मांडले. अनेक सदस्यांना सभागृहाबाहेर राहणे पसंत नव्हते. विधान परिषदेत भाजपचे सदस्य पाशा पटेल तर सभागृहाचे दार हळूच उघडून आत काय चालले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. दार किलकिले करून किती वेळ पाहणारअखेर ते निघून गेले.

संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद विरोधी आमदारांनाही मिळावे यासाठी त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. अर्थसंकल्पाचे वाचन होतानाही नेत्यांपेक्षा आमदार अधिक आक्रमक होते. आमदारांच्या आक्रमकपणाने नेत्यांनाही नमवले आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत अघटित घडले. शुक्रवारी सभागृहाचे कामकाज सुरू झालेतेव्हा विरोधी सदस्यांच्या रिकाम्या बाकांकडे पाहून विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दोन्ही बाजूंच्या सदस्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सभागृहाच्या प्रथा-परंपरा जपण्याचे भान विरोधकांनी ठेवले नसल्याबद्दल त्यांच्यावर टीका-टिप्पणीही केली.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP