Tuesday, March 29, 2011

अन् हाच पेच आहे..


दादांना त्यांच्या विश्वासातील लोकांनी काही गुप्त बातम्याही कळवल्या असून विरोधकांना भडकवण्यामागे राष्ट्रवादीतीलच काही सहका-यांचा हात आहे, असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली आहे. तसे पाहता दादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांनी पद्धतशीरपणे वृत्तपत्रांना दादांविरोधी बातम्या पुरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे विरोधकांना आपल्याच सहकाऱ्यांनी फूस लावली असावी, यावर दादांचा नक्कीच विश्वास बसला असावा.

आयुष्य तेच आहे
 
अन् हाच पेच आहे
 
तू भेटशी नव्याने
 
बाकी जुनेच आहे..
 
गझल नवाझ भीमराव पांचाळे यांच्या आवाजातील ही गझल महाराष्ट्रातील लाखो रसिकांपर्यंत पोहचलेली आहे. सध्या गझलेचे सूर राज्याच्या विधिमंडळातही घुमत असल्याचा भास होतो आहे. अनेक वर्षे विधिमंडळाचे सदस्य आणि सलग 11 वर्षे मंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासमोर विरोधकांनी चांगलाच पेच निर्माण करून ठेवला आहे. अजितदादा मंत्री म्हणून काम करताना अनेक विरोधी सदस्य कामे घेऊन त्यांच्याकडे जात आणि दादाही त्यांची कामे करत. विरोधक आणि दादा फार मोठा सामना रंगला असे यापूर्वी कधी सभागृहात किंवा सभागृहाबाहेर पहायला मिळाले नव्हते. मात्र ते उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी अर्थमंत्री या नात्याने पहिलाच अर्थसंकल्प सभागृहात सादर केलातेव्हा विरोधी सदस्यांनी सभागृहात अभूतपूर्व गोंधळ घातला. तेव्हा दादांना प्रश्न पडला.. मंत्री म्हणून मी या सभागृहात जुनाच आहे.. मग आजच हा पेच विरोधकांनी का बरं निर्माण केला असावा. दादांना त्यांच्या विश्वासातील लोकांनी काही गुप्त बातम्याही कळवल्या असून विरोधकांना भडकवण्यामागे राष्ट्रवादीतीलच काही सहका-यांचा हात आहेअसल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली आहे. तसे पाहता दादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांनी पद्धतशीरपणे वृत्तपत्रांना दादांविरोधी बातम्या पुरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे विरोधकांना आपल्याच सहका-यांनी फूस लावली असावीयावर दादांचा नक्कीच विश्वास बसला असावा.
 
भीमरावजींच्या शब्दात सांगायचे तर  दादांना वाटत असेल-
 
गाफिल राहिलो मी।
त्या नेमक्या क्षणाला॥
मागून वार केले।
माझ्याच माणसांनी॥
 
काही दिवसांत दादांच्या विरोधात वृत्तपत्रे व माध्यमातून वादग्रस्त वृत्ते प्रसारित होऊ लागली आहेत. मी टग्याच आहे’ असे कधीही बोललो नसताना ते माध्यमांपर्यंत पोहचले कसे याचा दादा सध्या शोध आहेत. पत्रकारांना दंडुक्यांनी मारले पाहिजे,असे विधान आपण केले नव्हतेतरीही पत्रकारांनी आपल्यावर बहिष्कार टाकला. नेमके काय बोललो हे राष्ट्रीवादीच्या मासिकात सविस्तर प्रसिद्ध झाले आहे. मी आहे तसाच आहे. मात्र उपमुख्यमंत्री झाल्यापासून लोकांना आणि पत्रकारांनाही वेगळा वाटू लागलो आहे. आपण भले आणि आपले काम भले अशीच माझी कामाची पद्धत राहिली आहे. त्याबाबत कोणीही कधी चर्चा केली नाही. वाद-विवाद केले नाहीत आणि मीही कोणत्याही वादाच्या भोव-यात सापडलो नाही. नसत्या गोष्टीत कधी पडलो नाहीतरी देखील केवळ उपमुख्यमंत्री झालो म्हणून मला वादात खेचले जात आहेअशी खंत दादांना वाटू लागली आहे.
 
म्हणूनच कदाचित भीमरावजी पांचाळे म्हणतात -
 
मी चाललो तरीही।
होतो तिथेच आहे।
हे दु:ख नेहमीचे
तेही तसेच आहे।
असेच दादांनाही वाटत असेल..
हे सभागृहात मांडावे तर
तेही सुनेच आहे।
केली शिकार माझी।
माझ्याच सद्गुणांनी॥
काटे कुठेच नव्हते।
केला दगा फुलांनी॥
 
आता या दगाफटका करणा-या ‘फुलां’चे दादा काय करणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

0 comments:

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP