Monday, December 29, 2014

नवे वर्ष, नवी स्वप्ने, नवा उन्माद

देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव करून भारतीय जनता पक्षाचे सरकार विराजमान झाले. जनतेला विकासाची नवी स्वप्ने दाखवून गेल्या ६५ वर्षांची काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणण्यात नरेंद्र मोदींना यश आले. काँग्रेसच्या गांधी-नेहरू घराण्यांनी कायम सत्ता हातात ठेवून घराणेशाहीचा ठपका ओढवून घेतला. या घराणेशाहीचा तसेच काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा घराघरांत पोहचवून मोदींनी काँग्रेसला पुरते लोळवले. 

Monday, December 22, 2014

बळीराजाच्या दु:खावर कुबेराच्या डागण्या

नैसर्गिक संकटात धनदांडगे शेतकरी तरुण जाऊ शकतील; परंतु शेतीच्या वाटण्या होऊन बहुसंख्य शेतकरी अल्प भूधारक झाले असताना बोटावर मोजण्या इतक्या धनदांडग्य़ा बागायतदारांसोबत सरसकट सर्व शेतकर्‍यांना बोगस ठरवणे चूक आहे. उद्योगपतींना कर्ज माफ करण्याची चूक असेल, तर शेतकर्‍यांना मदत न करणे ही महाचूक असेल. आता बोरूबहाद्दर नाहीत; पण जे कोणी संगणक बहाद्दर असतील त्यांनी विद्वत्ता पाजळण्यापूर्वी अवकाळी आणि गारपीट केवळ बागायतीवरच पडते, अल्पभूधारकांच्या शेतावर पडत नाही, असा समज करून घेतलेला दिसतो.

Monday, December 15, 2014

भाजपाने खुला केला हिंदुत्वाचा छुपा अजेंडा

नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या नावाने झंझावाती प्रचार करून लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवून दिले आणि 'अच्छे दिन आये' असे म्हणत भाजपाचा वारू चौखूर उधळू लागला. देशामध्ये प्रथमच असे अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर इतके दिवस छुपा असलेला हिंदुत्वाचा अजेंडा खुला होऊ लागला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिपत्याखाली असलेल्या हिंदुत्ववादी संघटना दहा तोंडांनी हिंदुत्वाच्या अजेंड्याचे सूतोवाच करत असतात. त्यावर जनमानसांतील प्रतिक्रिया आजमावून तो अजेंडा पुढे रेटला जातो. 

Monday, December 8, 2014

मोदींच्या सत्ताकारणाने होतेय भाजपची अडचण

भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे अखेर जमले, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, याचा प्रत्यय महाराष्ट्राने घेतला खरा. शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी जनमताचा आदर करण्यासाठी आम्हाला एकत्र यावे लागले, अशी गुळगुळीत वक्तव्ये सुरू झाली त्याच वेळी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी खात्री पटली. मलईदार खात्यांसाठी ताणलेले संबंध सैल झाले. 

Monday, November 24, 2014

पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल खाप पंचायतीकडे


महिलांवरील अन्याय, अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणार्‍या घटना सतत घडतच आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एका सरपंच महिलेला ग्रामपंचायतीच्याच सदस्याने भरसभेत केलेली मारहाण आणि विनयभंग या घृणास्पद प्रकाराचा तीव्र निषेध करावा तेवढा थोडा आहे. अहमदनगर जिल्हा हा मानवतेला काळिमा फासणारा, सामाजिकदृष्ट्या मागासलेला आणि गुन्हेगारीचा अड्डा असल्याची इतिहासात नोंद होईल अशा घटना येथे घडू लागल्या आहेत.

Monday, November 17, 2014

मॅच फिक्सिंगने केली साधनशूचितेची ऐसीतैशी..!


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाजी मतदानाने विश्‍वासदर्शक ठराव मंजूर केला खरा; पण हा आवाज बुलंद नसून दबका असल्याचीच प्रतिक्रिया सर्वत्र उमटली. फडणवीस यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत, त्यांना बहुमत आहे की नाही यापेक्षा राष्ट्रवादी कॉँग्रेसने विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी आवाजी मतदानात सहभाग घेतला की नाही, ताकाला जाऊन भांडं लपवण्याचा प्रयभाजप का करत आहे, याचीच चर्चा रंगू लागली आहे. 

Monday, November 10, 2014

शिवसेनेला तडजोडीचे शिवबंधन अमान्य

शिवसेनेने हिंदुत्वाच्या धाग्याचे भाजपाबरोबर शिवबंधन बांधून २५ वर्षे युती टिकवली. ही युती टिकवण्याकरिता अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेबांना साथ दिली. एकदा युतीचे बंधन बांधून घेतल्यानंतर मैत्री धर्म पाळण्याचे बंधन अनिवार्य होते. ते दोन्ही बाजूंनी निभावण्यात आले. 

Monday, November 3, 2014

राजकीय 'शहा'णपणाचा निर्णय

मोदी आणि शहा यांनी राजकीय शहाणपणाचा निर्णय घेतला आणि शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंचे मन वळवले. मंगळवारी उद्धव ठाकरे हे आमदारांसह एकवीरा देवीचे दर्शन घेऊन येतील आणि मग शिवसेनेच्या आमदारांचा शपथविधी होईल. निदान हा विस्तारित शपथविधी तरी राजशिष्टाचारानुसार राजभवनात व्हावा, अशी दक्षता राज्यपाल आणि स्वत: उद्धव ठाकरे घेतील, अशी अपेक्षा आहे.

Monday, October 27, 2014

बुरसटलेल्या मनाचीही साफसफाई करा!


संपूर्ण देशभर दीपावलीचा आनंदोत्सव साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील दूरवरच्या खेड्यात एका दलित कुटुंबातील आईवडील आणि त्यांच्या एकुलत्या एका मुलाची हत्या केली जाते. हे हत्याकांड इतक्या निर्घृणपणे घडवण्यात आले की, १९ वर्षांच्या कोवळ्या मुलाचे तुकडे तुकडे करण्यात आले. तिन्ही प्रेते विहिरीत फेकून देण्यात आली. मानवी शरीराचे असे तुकडे केलेले पाहून कोणत्याही माणसाच्या अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हे क्रौर्य पाहून कोणाही सहृदय माणसाची मान शरमेने खाली जाईल.

Monday, October 20, 2014

सत्तापरिवर्तन...काँग्रेसचे पतन!

महाराष्ट्राच्या राजकारणावर असलेली कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पकड ढिली होऊन हे दोन्ही पक्ष पराभवाच्या गर्तेत लोटले गेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून शिवसेना-भाजपा युतीचे साडेचार वर्षांचे विरोधी पक्षाचे सरकार वगळता राज्यावर कायम कॉँग्रेसचेच वर्चस्व राहिले. परंतु गेल्या १५ वर्षांच्या आघाडीच्या कालखंडात मंत्र्यांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपाने सरकारची बदनामी होत राहिली. 

Thursday, October 16, 2014

पोस्टर लय भारी, रिकामी तिकीट बारी!


विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. ठिकठिकाणी प्रमुख पक्षांच्या नेत्यांची पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. पोस्टर्स, होर्डिंग्ज, वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयसुरू आहे. भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे अशा स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांचा धुमाकूळ महाराष्ट्रभर सुरू आहे. या सर्व पक्षांच्या पोस्टर बॉईजना आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार, अशी स्वप्ने पडू लागली आहेत. 

Monday, October 6, 2014

नेत्यांनी केली आंबेडकरी चळवळीची वाताहत

यंदाची विधानसभा निवडणूक म्हणजे जनतेच्या मनोरंजनाचा मोठा धमाका असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची संख्या पाहता बहुरंगी लढतींनी चांगलीच रंगत येणार आहे. कोण नंबर एक आणि कोण नंबर दोन याचे आडाखे बांधले जात आहेत. निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे आकडे पाहिले, तर गोंधळाची परिस्थिती दिसून येत आहे. युती आणि आघाडी यांची फाटाफूट झाल्यामुळे तेही गोंधळलेले आहेत. यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाच्या पक्षाचा जो गोंधळ झाला, त्याचीही भर पडली. 

Tuesday, September 30, 2014

सत्तेसाठी वाट्टेल ते..!

महाराष्ट्रात सत्तेचे स्वयंवर होणार आहे. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. सत्ता वरणार कुणाला, कोणाच्या गळ्यात विजयश्रीची माळ घालणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राजे -राजवाड्यांच्या काळात स्वयंवरासाठी जमलेल्यांवर लाह्यांचा वर्षाव होत असे. आज सर्वपक्षीय उमेदवार ऐकमेकांवर शिव्यांची लाखोली वाहत स्वयंवराच्या प्रतीक्षेत आहेत. स्वयंवराची तयारी सुरू झाली आहे. सत्ता मिळवणार कोण याबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण झाले आहे..

Monday, September 22, 2014

सर्वांनाच व्हायचंय नंबर वन!

विधानसभा निवडणुकांचे नगारे जोरजोरात वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ सात दिवसांचा अवधी उरला असून युती-आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे इच्छुकांचा रक्तदाब वाढू लागला आहे आणि कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. हा तिढा सुटत नसेल तर स्वबळावर जागा लढवा, असा दबाव कार्यकर्ते वाढवू लागले आहेत.

Monday, September 15, 2014

मुंडेंच्या वारसदाराला सीएम करणार का?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच सरकार स्थापनेची उत्सुकता वाढू लागली. पुढील महिन्याच्या १५ तारखेला मतदान होऊन १९ तारखेला लगेच निकाल लागणार असल्याने या राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण? याची स्पर्धा राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली आहे. प्रत्येकानेच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उडी मारून धावण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार आणि तो मीच होणार, अशी स्वप्ने पडू लागली आहेत. 

Monday, September 8, 2014

शिक्षणाकडून राजकारणाकडे : मोदींचे व्हिजन


शिक्षक दिनानिमित्त हेडमास्टर नव्हे तर स्वत:ला टास्क मास्टर म्हणवून घेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणाकडून राजकारणाकडे जाण्याचे अफलातून व्हिजन देशासमोर ठेवले आहे. त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी शिकवणी तर दिलीच; पण अप्रत्यक्षपणे राजकारण्यांचीही चांगलीच सुनावणी घेतली. पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीची दूरदृष्टी, त्याचे व्हिजन कसे असावे याचे प्रात्यक्षिकच त्यांनी देशाला करून दाखवले. याअगोदर देशात डझनभर पंतप्रधान झाले; परंतु देशभरातील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा प्रय▪आतापर्यंत कोणीही केला नाही. त्यामुळे मोदींचा हा नवा प्रयोग सर्वांनाच भावला.

Monday, September 1, 2014

जनतेला गृहीत धरू नका..

देशातील पोटनिवडणुकांनी फुगा फोडून टाकला आहे. याचा बोध महाराष्ट्रातील युतीच्या नेत्यांनी घेण्याऐवजी प्रत्येक जण एकमेकांसमोर दंड थोपटून उभा राहिला आहे. पोटनिवडणुकीच्या निकालांनी जनतेला राजकीय नेत्यांनी कायम गृहीत धरू नये, हा संदेश दिला आहे.

Monday, August 25, 2014

नरेंद्र मोदी सर्मथकांना आवरा.!

मोदी लाटेमुळे महायुतीची इच्छापूर्ती होण्याची शक्यता आहे. म्हणून सत्तेसाठी कोणतीही कसूर सोडायची नाही, असे त्यांनी मनावर घेतले आहे. त्यासाठी भले मुख्यमंत्र्यांचा अपमान झाला तरी चालेल, असे मानून त्यांचे काम चालू आहे. मात्र, या प्रकारामुळे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा अपमान होत आहे.

Monday, August 18, 2014

राजकीय पक्षांची स्वबळाची भाषा फसवी

लोकसभा निवडणूक संपल्यापासून आघाडी आणि महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा रंगू लागली आहे. जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी उसने अवसान आणून 'तू-तू मैं-मैं' होऊ लागली आहे. आघाडीमध्ये या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक आक्रमक झाली असून विधानसभेच्या २८८ जागांपैकी निम्म्या जागा मिळण्यासाठी या पक्षाचा अट्टाहास चालू झाला आहे. 

Monday, August 11, 2014

विधानसभा निवडणुकीवर हिंसाचाराचे सावट

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणी होत असतानाच आंदोलनेदेखील तीव्र होऊ लागली आहेत. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कायदा हातात घेण्यापर्यंत आंदोलकांची मजल गेली आहे.

Monday, August 4, 2014

विद्यार्थ्यांचा दबाव, केंद्र सरकार हतबल

एखाद्या हट्टी, दुराग्रही, लाडावलेल्या मुलाने आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी पालकाला हैराण करावे, त्यांच्यावर दबाव आणावा, अखेर पालकांनी त्याची इच्छा पूर्ण करावी. याचा अनुभव असंख्य पालक घेत असतात. त्याच धर्तीवर दिल्लीतील हिंदी भाषिक विद्यार्थ्यांनी यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा) परीक्षेतील नागरी सेवा पूर्वपरीक्षा कल चाचणी (सी सॅट) विरोधात तीव्र आंदोलन केले असून, सर्व राजकीय पक्षांसहित केंद्र सरकारनेही त्यांचे लाड पुरवावेत व त्यातील एक कठीण परीक्षा रद्द करावी, अशी मागणी लावून धरली. 

Monday, July 28, 2014

आदिवासी-धनगरांच्या कात्रीत सरकार!

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होण्याआधी मराठा-मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मार्गी लावला. आता धनगर, लिंगायत या जाती पुढे आल्या आहेत. धनगरांनी तर मंत्रालय हादरून टाकणारे आमरण उपोषण आंदोनल सुरू केले आहे. मराठी-अमराठी, हिंदू-मुस्लीम या वादांनी राजकारण वादग्रस्त बनून समाजा-समाजामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न झाले. या पुढील काळात जाती-जातींमध्ये आरक्षणाच्या मुद्दय़ावरून विद्वेष पसरू लागला आहे. ही प्रकरणे वाढली तर जाती-जातींमध्ये यादवी माजून तुंबळ युद्धे होतील की काय, असे वाटू लागले आहे. सर्वच जातींना आरक्षणाचे जास्तीत जास्त लाभ पदरात पाडून घ्यायचे आहेत. त्यामुळे सर्वजण एकमेकांविरुद्ध उभे राहून महाराष्ट्रात भडका उडेल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शासकीय सेवा भरती आणि शिक्षणाबरोबरच राजकीय आरक्षणावर डोळा असल्यामुळे सगळा आटापिटा चालला आहे.

Monday, July 21, 2014

नारायण राणेंच्या बंडाचे काय होणार?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास जेमतेम महिनाभराचा अवधी उरलेला असताना सत्ताधारी कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले आणि राजकीय वातावरण तापले. गेले काही दिवस राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याचे वृत्त येऊ लागले. भुजबळांनी या वृत्ताचा इन्कार केला, मात्र आपल्या सर्मथकांची फौज शिवसेनेत पाठवून दिली. पुढे-मागे काय होईल, हे काळ ठरवेल; परंतु बंडाच्या पवित्र्यात असलेल्या भुजबळांचे नाव आपोआप मागे पडले, याला कारणही तसेच घडले. 

Monday, July 14, 2014

गजबजलेल्या वस्तीतून हलवा श्रद्धास्थळे !

भाविकांच्या तसेच नागरिकांच्या जीवाला धोका असेल आणि दहशतवाद्यांना रोखण्याचे ठोस उपाय होत नसतील तर अशी मंदिरे सुरक्षितस्थळी हलवणेच योग्य ठरेल. मंदिरांना तसेच भाविकांच्या जीवाला धोका होणार असेल तर मंदिरे सुरक्षित स्थळी हलवावीत; अन्यथा गजबजलेल्या वस्त्या हटवून मंदिरे तरी सुरक्षित करावीत. या मुद्दय़ाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.

Monday, July 7, 2014

पाणी बचतीचा चिनी प्रवाह

जिथे पाणी आहे तिथे मुबलक वापर होत आहे, अनेक ठिकाणी नळ उघडे ठेवून घराबाहेर जाणार्‍यांची संख्या कमी नाही. असा बेशिस्त वापर होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात मात्र पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन महिलांना आजही मैलोन् मैल पायपीट करावी लागत आहे.

Monday, June 30, 2014

मराठा आरक्षणाचा फायदा कोणाला?


महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या पहिल्याच भाषणात हे राज्य मराठय़ांचे की मराठींचे, ही शंका दूर करताना आपण मुख्यमंत्री असेपर्यंत हे राज्य मराठींचे असेल, असे उद्गार काढले होते; परंतु आज हे राज्य मराठींचे नसून मराठय़ांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यशवंतरावांच्या विचारापासून देखील नेते दुरावत गेले. राज्य मराठींचे होऊ शकले नसल्याचा फायदा शिवसेना आणि मनसे या पक्षांनी उचलला. त्यांनी मराठी माणूस आणि मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता असल्याचे सांगून मराठी माणसांचा विश्‍वास मिळवण्याचा प्रय▪केला.

Monday, March 31, 2014

अखेर 'आदर्श'चे 'भूत' उतरवले!

अशोकरावांनी राष्ट्रवादीच्या सर्व 'अर्थपूर्ण' फायली रोखून धरल्या आणि राष्ट्रवादीवाले चांगलेच संतापले. त्याचप्रकारे पृथ्वीराजबाबांनी राष्ट्रवादीला लगाम घालण्यास सुरुवात करून नेतृत्वाची चमक दाखवली. पुढील काळात काँग्रेसला ताकद द्यायची असेल तर अशोक चव्हाणांचे नाव आघाडीवर राहू शकते. अशोकरावांच्या बहुचर्चित पुनर्वसनाचा काँग्रेसला फायदा होईल की तोटा, हे निकालानंतरच समजून येईल. आज तरी महाराष्ट्रात विलासरावांनंतर कोण? या प्रश्नाचे उत्तर अशोकरावांच्या पुनर्वसनात दडले आहे.

Monday, March 24, 2014

शवंतराव चव्हाण अखेर एका झंझावाताची..?

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एखाद्या राजकीय नेत्याच्या जीवनावरील चित्रपट दाखवला जात असेल, तर त्याचा संबंध निवडणुकीच्या प्रचारासाठी असल्याचा ठपका येऊ शकतो. नेमके हेच 'यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची' या चित्रपटाबाबत घडले आहे. 

Monday, March 10, 2014

शेतकरी हवालदिल; नेते प्रचारात मश्गूल

गारपीटग्रस्त शेतकरी संकटात सापडला असताना त्यांना अद्यापि तात्पुरती देखील आर्थिक मदत दिलेली नाही, सर्व नेत्यांचे निवडणूक प्रचार दौरे मात्र जोरात सुरू असून सत्तासंघर्षासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पक्षांचे नेते व्यस्त असताना महाराष्ट्रावर 'ना भूतो न भविष्यती' असे अस्मानी संकट कोसळले आहे. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या प्रमुख पक्षांचे मोठमोठे नेते राज्यात प्रचारासाठी येत असल्यामुळे या नेत्यांच्या पुढे, पुढे करण्यात नेते मश्गूल आहेत. 

Monday, March 3, 2014

जिंकले तर हीरो, नाही तर..!

नाशिकच्या राजकारणातून भुजबळांचा अथवा त्यांचे पुतणे विद्यमान खासदार समीर भुजबळ यांचा पत्ता कट करण्याचा आणि दोघांचेही खच्चीकरण करण्याचा प्रय▪दिसत असल्याने भुजबळांच्या उमेदवारीवरून नाराजी वाढली आहे. अर्थात मागील निवडणुकीत मनसे उमेदवाराने समीर भुजबळ यांची चांगलीच दमछाक केली होती. राष्ट्रवादीचा एकही आमदार नसलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळांना देखील निवडणूक कठीण आहे.

Monday, February 24, 2014

दिल्लीचा गोंधळ बरा होता!

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र ही केवळ रणधुमाळी नाही तर याला फंदफीतुरीबरोबरच गुंडगिरी आणि मारामारीचे स्वरूप आले आहे. यामुळे जो महागोंधळ निर्माण झाला आहे त्यावरून आगामी काळात राजकारण आणखी किती खालच्या पातळीवर जाणार आहे याची कल्पनाच केलेली बरी. कालचा दिल्लीतला गोंधळ बरा होता असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Monday, February 17, 2014

दलित पँथर संघर्षावर नवा प्रकाशझोत

मृत्यूशी झुंज देणारा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा महाकवी आणि दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ दवाखान्याच्या खोलीत तटस्थपणे पँथरच्या संघर्षाचे विश्लेषण करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर एका महिन्याच्या आतच शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत झाले. भाष्य प्रकाशनचे महेश भारतीय, नामदेव ढसाळांच्या पत्नी कवयित्री मल्लिका अमरशेख तसेच ढसाळांचे पँथरचे सहकारी व जिवलग मित्र साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी निर्धाराने हे पुस्तक प्रयत्नपूर्वक वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाशित केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे लागेल. या पुस्तकाने दलित पँथरच्या संघर्षावर नवा प्रकाशझोत तर टाकला आहेच; पण त्याचबरोबर पँथरच्या संघर्षाचे वास्तवही जगासमोर आणले आहे.

Monday, February 10, 2014

जनार्दनाने घटवला काँग्रेसचा जनाधार!

आरक्षण द्यायचेच असेल तर मागास जातीतील गरीबांना तसेच बिगर मागास जातीतील गरीबांनाही द्या, अशी मागणी करणे सोपे आहे; पण ती अमलात आणणे कठीण आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जबाबदार नेत्याने आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचे बेजबाबदार विधान करून काँग्रेसला अधिक अडचणीतच आणले आहे.

Monday, February 3, 2014

खरेदी-विक्री संघाचा धंदा तेजीत

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक ही नेहमीच घोडेबाजार, राजकीय कुरघोड्या आणि आमदारांचे खरेदी-विक्री यामुळे गाजत असते. राजकारण भ्रष्टाचाराने बरबटले असल्याचा पुरेपूर फायदा धनदांडग्यांनी उचलला असून, पैसा फेका आणि राज्यसभा मिळवा, असा सोपा मार्ग त्यांना सापडला आहे. 

Monday, January 20, 2014

खासगी सावकारीला बसणार चाप

हंगामाच्या सुरुवातीला बी-बियाणे, खते यासाठी तातडीच्या रकमेची आवश्यकता असते. या सार्‍या गरजा खाजगी सावकारांकडून भागवल्या जातात. पाहिजे तेव्हा पैसे मिळत असल्याने हा पर्याय सुलभ वाटत राहिला. अजूनही काही प्रमाणात हे चित्र कायम आहे; परंतु या सावकारांकडून कर्ज रकमेवर अव्वाच्या सव्वा व्याज आकारले जाते. त्यामुळे वर्षानुवर्षे परतफेड करत राहूनही कर्ज पूर्णत: चुकते करणे शक्य होत नाही. 

Monday, January 13, 2014

आप रे आप.. राजलाही ताप

'आप'चा फटका सगळ्याच पक्षांना बसण्याची शक्यता आहे; पण सर्व पक्षांहून आपण वेगळे असल्याची केलेली वल्गना टिकवण्यासाठी राज यांनाही बराच खटाटोप करावा लागणार आहे. नाराज, भ्रमनिरास झालेल्या, दुखावलेल्या मतदारांची मोट बांधताना त्यांनाही 'आप'चा अडसर होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कदाचित, त्यामुळेच मोदी आणि 'आप'च्या माध्यमातून त्यांनी हे एकाच धनुष्यातून दोन तीर मारले आहेत. ते कोणाच्या वर्मी लागतात की नुसतेच हवेत जातात, हे आगामी काळच ठरवेल.

Monday, January 6, 2014

पुरोगामी नेत्यांनाही सावित्रीचे विस्मरण

गेल्या ३ जानेवारी रोजी राष्ट्रसेवा दलाच्या महिलांनी पुणे विद्यापीठावर दुचाकी रॅली काढून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाव धारण करणारा फलक मोठय़ा उत्साहात, घोषणांच्या गजरात विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लावला आणि चेंडू सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. 

About This Blog

महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण याचा वेध आणि अंतर्वेध घेऊन निखळ वास्तव सर्वदूर पोहचवण्याकरीता हा ब्लॉग तुम्हा सर्वांसाठी... ‘दैनिक ‘प्रहार’ मधील ‘आर-पार’व दैनिक पुण्यनगरीमधील जय महाराष्ट्र या सदरातून आणि अन्य लेखांमधून घेतलेला हा आर-पार परामर्श. या ब्लॉगवर त्याचा एकत्रित संग्रह तसेच या पुढील काळातील ताजी सदरे आणि वृत्त विश्लेषन उपलब्ध आहे.

Popular Posts

Footer

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP